
प्रशिक्षक गौतम गंभीरने स्पष्ट केला मास्टरप्लॅन (Photo Credit- X)
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी संवाद साधताना गौतम गंभीरने स्पष्ट केले की, आयपीएल २०२६ संपल्यानंतर भारतीय संघ अधिकृतपणे २०२७ च्या विश्वचषकासाठी तयारी सुरू करेल. गंभीरच्या मते, आता क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामने खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे, त्यामुळे उपलब्ध वेळेचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.
Indian team head coach Gautam Gambhir believes that by the end of IPL 2026, India will have a solid blueprint for the ODI World Cup 2027 🏏#GautamGambhir #IndianCricket #ODI #WC27 #CricketTwitter pic.twitter.com/82zgv3yeho — InsideSport (@InsideSportIND) March 10, 2026
गंभीर म्हणाला, “आयपीएल २०२६ आणि आगामी २०२७ चा विश्वचषक यांच्यामध्ये भारतीय संघाला सुमारे २५ ते ३० वनडे सामने खेळायला मिळणार आहेत. सध्या हा फॉरमॅट फारसा खेळला जात नसल्यामुळे, आम्ही जितक्या लवकर नियोजनाला सुरुवात करू, तितके ते संघाच्या हिताचे ठरेल. आयपीएल संपताच या मिशनवर काम सुरू होईल.”
विश्वचषक जिंकल्यानंतर Rinku Singh भावूक! वडिलांसाठी लिहिली काळजाला भिडणारी पोस्ट; म्हणाला…
२०२७ च्या वनडे विश्वचषकाचे यजमानपद दक्षिण आफ्रिकेकडे आहे. तिथल्या खेळपट्ट्या आणि हवामान भारतीय उपखंडापेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. यावर भाष्य करताना गंभीरने सांगितले की, “दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट खेळणे कधीही सोपे नसते. तिथल्या उसळत्या खेळपट्ट्यांवर प्रभावी ठरू शकतील अशा खेळाडूंची ओळख पटवणे हे आमचे पहिले काम असेल. आम्हाला अशा खेळाडूंचा संच तयार करायचा आहे जे तिथल्या कठीण परिस्थितीतही सर्वोत्तम कामगिरी करू शकतील.”
पुढील दीड वर्षात टीम इंडियाचा ‘ब्लूप्रिंट’ कसा असेल, याबाबत गंभीरने संकेत दिले आहेत. निवड समिती आणि कोचिंग स्टाफ मिळून अशा खेळाडूंची यादी तयार करतील ज्यांना २०२७ च्या दृष्टीने तयार केले जाईल. आयपीएल २०२६ संपता संपता विश्वचषकासाठी संभाव्य खेळाडूंचा आणि रणनीतीचा आराखडा पूर्णपणे तयार असेल, असा विश्वास गंभीरने व्यक्त केला आहे. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये झालेल्या पराभवाची कसर भरून काढण्यासाठी आणि भारताला पुन्हा एकदा ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये जागतिक चॅम्पियन बनवण्यासाठी गौतम गंभीरची ही ‘गंभीर’ रणनीती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.