
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला आले अपयश
हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स आणि कर्णधारपद सोडण्याची चर्चा
2024 पासून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी
Hardik Pandya Leave Mumbai Indians: आयपीएल 2026 चा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. यंदा अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. सध्या प्ले ऑफचे सामने सुरू आहेत. आज गुजरात विरुद्ध राजस्थान क्वालिफायर 2 मध्ये भिडणार आहेत. मात्र त्याचवेळेस मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. हार्दिक पंड्या मुंबईचा संघ सोडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2026 चा हंगाम अत्यंत खराब ठरला आहे. संघ पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर होता. 14 पैकी 4 च सामने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत. या खराब कामगिरीनंतर आता संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईला रामराम ठोकणार असल्याचे म्हटले जात आहे.
हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सचे नाते आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. सलग दोन वर्षांचा मानसिक दबाव आणि संघातील अंतर्गत कलहामुळे हार्दिकने फ्रँचायझी सोडण्याचा विचार केला असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र अशी चर्चा सुरू असल्याचे समजते आहे.
‘आम्ही पूर्ण संधी दिली पण…’ किरॉन पोलार्डने दिली Hint, हार्दिक पांड्याकडून जाणार Captaincy
मुंबई इंडियन्सचे नेतृत्व 2024 मध्ये हार्दिक पंड्याने स्वीकारले. हार्दिक पंड्यासाठी 2026 चा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला. केवळ खराब निकाल नव्हे तर ड्रेसिंग रूममधील तणावपूर्ण वातावरण यामुळे हार्दिक पंड्या व्यथित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे समोर आलेल्या माहितीनुसार, आता बास झाले अशी भूमिका पंड्याने घेतल्याचे म्हटले जात आहे.
समजा हार्दिक पंड्याने मुंबईची साथ सोडली तर तो मेगा ऑक्शनमध्ये आपले नाव नोंदवू शकतो किंवा पुन्हा एकदा त्याच्या जुन्या गुजरात टायटन्स संघाकडे परतण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटला हार्दिक पंड्याने संघ सोडण्याचे दिले संकेत दिले असल्याचे म्हटले जात आहे.
हार्दिक पांड्याकडून जाणार Captaincy
पोलार्ड यांनी हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाबद्दल उघडपणे भाष्य केले आणि सांगितले की, हा हंगाम स्वतः हार्दिकच्या किंवा संघ व्यवस्थापनाच्या अपेक्षेप्रमाणे नव्हता. सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून, गोष्टी हार्दिकच्या मनासारख्या घडल्या नाहीत. पण एक गोष्ट निश्चित आहे. आम्ही त्याला संघाचे नेतृत्व करण्याची आणि यशस्वी होण्याची प्रत्येक संधी दिली आहे.”