अर्शदीप सिंग(फोटो-सोशल मीडिया)
IND vs AUS 1st T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची T20I मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना आज कॅनबेरा येथे खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या दरम्यान रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग आणि नितीश रेड्डी यांना भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू देण्यात आला. या दरम्यान आता अर्शदीप सिंगला अंतिम ११ मधून वगळण्यात आल्याने चाहत्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या व्यवस्थापनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयावर चाहत्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून अर्शदीप सिंगला संघात स्थान दिले गेले नाही तर हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. चाहते सोशल मीडियावर टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयाचा तीव्र निषेध करताना दिसत आहेत. काही चाहत्यांच्या प्रतिक्रिया खालीलप्रमाणे आहेत.
Arshdeep singh >>> farzi rana anyday 🤡 pic.twitter.com/QRtbK0gnNq — कृष्णा (@iiamkrshn) October 29, 2025
Wtf, You Are Playing Harshit Rana In The Playing 11 Before Arshdeep Singh, The Best Bowler Of India In T20i. Unreal Politics Bc 🤡. pic.twitter.com/xsQVCZHxip — Aufridi Chumtya (@ShuhidAufridi) October 29, 2025
This clown Gautam Gambhir’s has destroyed Indian team where merit has no place. – Dropped Jaiswal from T2OIs for his fvrt Gill,
– Dropped Arshdeep for his fvrt Harshit,
– Dropped Samson from opening in T2OIs,
– Dropped Samson from ODIs after 100,
– Sacked Rohit as captain,
-… pic.twitter.com/yRYZp1KrmN — Rajiv (@Rajiv1841) October 29, 2025
Now , this actually is shameless behaviour from Gautam Gambhir .
He always keeps dropping Arshdeep from the playing 11 and gives long rope to Harshit Rana despite poor performances .
I mean this utter bullshit , how can someone not raise their voice against this shameful act… pic.twitter.com/wKcNL2D1gw — Stumper (@TheStumpStory) October 29, 2025
मनुका ओव्हलमधील खेळपट्टी संतुलित असल्याचे मानले जाते. गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये मोठी मदत मिळते, तर फलंदाजांना धावा काढण्यासाठी क्रिजवर थोडा वेळ घालवावा लागतो. एकदा सेट झाल्यानंतर, फलंदाज येथे मोठे डाव खेळण्यास खेळू शकतात. तथापि, या खेळपट्टीवर लक्ष्यांचा पाठलाग करणे सोपे मानले जात नसून या मैदानावर आतापर्यंत एकूण ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी चार सामन्यांचा निकाल लागला आहे, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. येथील सरासरी धावसंख्या सुमारे १४४ धावा इतकी आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोन वेळा विजय मिळवला आहे आणि पाठलाग करणाऱ्या संघाला दोनदा यश मिळाले आहे.
हेही वाचा : ICC Ranking : कर्णधार शुभमन गिलला हिटमॅनने टाकले मागे! रोहित शर्मा जगातील नंबर 1 ODI फलंदाज
भारताचा अंतिम संघ
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियाचा अंतिम संघ
मिशेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, मिशेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, जोश फिलिप, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन आणि जोश हेझलवूड.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात पावसाने व्यत्यय आणला असून सामना दोन वेळा थांबवण्यात आला आहे. पावसामुळे सामना १८ ओव्हरचा करण्यात आला आहे. त्यात भारताने ९.४ ओव्हर खेळत एक गडी गमावून ९७ धावा उभ्या केल्या आहेत. अभिषेक शर्मा( १९) लवकर बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादव नाबाद ३९ धावा तर शुभमन गिल नाबाद ३७ धावा केलेल्या आहेत.






