
काळोखात खेळली गेली सुपरओव्हर (फोटो सौजन्य - फेसबुक)
या वादात चाहत्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे संध्याकाळचे ६ वाजले होते आणि मैदानात अंधार सतत वाढत होता, मग सुपर ओव्हरच्या वेळी स्टेडियमचे फ्लडलाइट्स का चालू केले गेले नाहीत? आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे फ्लडलाइट्स होते, तरीही ते चालू नव्हते. स्पर्धेचे नियम जाणून घेऊया आणि पंचांनी दिवे का लावले नाहीत आणि भारतीय संघाला अंधारात का खेळावे लागले हे देखील समजून घेऊया.
IND A vs SL A: चर्चा तिलक वर्माच्या ‘त्या’ कृतीची; सुपर ओव्हरआधी अंपायरसोबत थेट…, Video Viral
नक्की काय होते कारण?
सगळ्यात आधी जाणून घ्यायला हवे ते म्हणजे, स्पर्धेतील वादाचे सर्वात मोठे कारण ठरले कडक नियम. या तिरंगी मालिकेच्या नियमांनुसार, सामने पूर्णपणे नैसर्गिक प्रकाशात आयोजित केले जाणार होते. पण या संपूर्ण स्पर्धेसाठी दोन्ही संघांसाठी परिस्थिती सारखीच असावी हे आधीच ठरले होते, त्यामुळे फ्लडलाइट्सचा अजिबात वापर केला जाणार नाही.
यामुळेच संध्याकाळी ६ वाजल्यानंतर सामना बरोबरीत सुटला तेव्हा पंचांचाच गोंधळ उडाला. मैदानावर दिवे लावण्याची परवानगी नसल्याने या स्पर्धेच्या नियमांनुसार सुपर ओव्हर आयोजित केली जाऊ शकते की नाही याबद्दल ते संभ्रमात होते.
तिलक वर्मा संतापला
या प्रकरणावर भारतीय कर्णधार तिलक वर्मा पंचांवर चांगलाच संतापल्याचेही वृत्त आहे. तिलकच्या म्हणण्यानुसार, जेव्हा नियमानुसार दिवे चालू करता येत नाहीत आणि खराब प्रकाशामुळे चेंडू दिसणे कठीण होते, तेव्हा सुपर ओव्हर घेणे खेळाडूंसाठी धोकादायक ठरू शकते. एवढेच नाही तर तिलक वर्माने श्रीलंका अ संघाच्या कर्णधारासह लाइट मीटरचे रीडिंगही तपासले होते, जेणेकरून काहीही चूक होणार नाही.
अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये १-१ गुण विभागून सामना संपवला जावा, कारण फ्लडलाइटशिवाय अंधारात खेळणे अयोग्य आहे, असा युक्तिवाद भारतीय कॅम्पने केला होता. इतके असतानाही, पंचांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि जबरदस्तीने सामना सुपर ओव्हरमध्ये खेचला आणि त्याचा परिणाम हातात आलेला सामना भारताने गमावला. यामध्ये अनेक जण सध्या अंपायरला चुकीचं ठरवत आहेत. इतक्या अंधारात सुपरओव्हर न खेळवता दोन्ही संघांना १-१ गुण देता आला असता तरीही हट्टाने अंपारयने सुपर ओव्हर खेळवली आणि ज्यामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूमध्ये तणावाचे वातावरण आणि राडा झाला असल्याचे दिसून आले. यावेळी वैभव सूर्यवंशीदेखील श्रीलंकेविरूद्ध भिडला.