
भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार
श्रीलंका अन् बीसीसीआयकडून अद्याप घोषणा नाही
भारत अन् श्रीलंका दोन कसोटी सामने खेळणार
India Visit Sri Lanka: सध्या भारतीय क्रिकेट संघ अफगणिस्तान विरुद्ध एकदिवसीय सिरिज खेळत आहे. मात्र पुढील काही महीने भारतीय संघ व्यस्त असणार आहे. लवकरच भारत इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध टी 20 सामने खेळणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. मात्र लवकरच ऑगस्ट महिन्यात भारताचा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असल्याचे समोर येत आहे.
पुढील काही महीने क्रिकेट चंहत्यांसाठी पर्वणीच असणार आहे. भारतीय संघ अनेक संघांच्या विरुद्ध वनडे सिरिज आणि कसोटी सामने खेळणार आहे. ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समोर येत आहे. श्रीलंका आणि भारतीय संघ डब्ल्यूटीसी अंतर्गत दोन कसोटी सामने खेळणार असल्याचे म्हटले जात आहे.
पहिला कसोटी सामना भारत आणि श्रीलंकेमध्ये 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान खेळवला जाण्याची शक्यता आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड किंवा बीसीसीआयने या दौऱ्याची अधिकृत घोषणा केली नाहीये. तर दूसरा सामना 23 ऑगस्टपासून खेळला जाऊ शकतो. लवकरच या दौऱ्याची आणि त्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
‘सरपंच’ इज बॅक! Shreyas Iyer सांभाळणार T20 चा कारभार ; इंग्लंड-आयर्लंडचे धाबे दणाणले
भारत आणि श्रीलंका संघ टी 20 सिरिज देखील कहळणार असल्याचे देखील समोर येत आहे. दोन्ही संघांमध्ये 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळली जाऊ शकते. त्यामुळे क्रिकेटचे चाहते या दौऱ्याची घोषणा होण्याची वाट पाहत आहे. त्याआधी भारतीय संघ कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात इंग्लंड अन् आयर्लंडविरुद्ध टी 20 सिरिज खेळणार आहे.
इंग्लंड-आयर्लंडचे धाबे दणाणले
बीसीसीआयने श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून घोषित केले आहे. तर तिलक वर्माला उपकर्णधार म्हणून जबाबदारी दिली गेली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान देण्यात आले आहे. टीम इंडिया इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध टी – 20 सामना खेळणार आहे.
Shreyas Iyer: ‘कोणासारखं होण्यासाठी मी…’; T20 संघाचा कर्णधार होताच श्रेयस अय्यरचे मोठे विधान
आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटविण्यात आले आहे. तर श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून संधी देण्यात आली आहे. या दोन्ही सिरिजसाठी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची देखील निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वैभव भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. आयपीएलमधील उत्कृष्ट नेतृत्व आणि कामगिरीच्या जोरावर श्रेयस अय्यर आता भारताचा पूर्णवेळ टी-२० कर्णधार बनला आहे. मागील काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या सूर्यकुमार यादवला टी-२० संघातून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
भारताचा संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार ), तिलक वर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, प्रिन्स यादव