
वूमन्स टी-20 वर्ल्ड कप लवकरच सुरू होणार
14 जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान लढत होणार
हरमनप्रीत कौर करणार भारतीय संघाचे नेतृत्व
India Vs Pakistan: भारतीय चाहत्यांना लवकरच एका नव्या स्पर्धेची मजा अनुभवायला मिळणार आहे. लवकरच आयसीसी टी -20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. वूमन्स टी-20 वर्ल्ड कप लवकरच सुरू होणार आहे. यासाठी भारतीय महिला संघाची निवड झाली आहे. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. 12 जूनपासून वर्ल्ड कप सुरू होणार आहे. या स्पर्धेत चाहत्यांना भारत पाकिस्तान सामन्याचा आनंद घेता येणार आहे.
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 अंतर्गत होणाऱ्या या महामुकाबल्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर जगभरातील क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 जून 2026 रोजी होणार आहे.
इंग्लंडमधील बर्मिंगहॅम स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी सुरू होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानविरुद्ध आणि संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषण करण्यात आली आहे. संघाची धुरा अनुभवी हरमनप्रीत कौर हिच्याकडे सोपवण्यात आली असून, उपकर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मानधना सांभाळणार आहे.
आकडेवारीनुसार, भारताचे पारडे आयसीसी स्पर्धेत नेहमीच पाकिस्तानवर जड राहिले आहे. मागील काही वर्षांत भारतीय महिला संघाने सातत्याने पाकिस्तानचा पराभव केला आहे.त्यामुळे भारतीय संघाचे पारडे जास्त मजबूत पाहायला मिळत आहे. 14 जून रोही भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आपला दुसरा सामना 17 जून रोजी नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. तर 21 जून रोजी भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. आफ्रिकन संघाकडे असलेले दर्जेदार वेगवान गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज पाहता, हा सामना अत्यंत अटीतटीचा होण्याची शक्यता आहे. 28 जून रोजी भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला सर्वात महत्वाचा सामना असणार आहे. सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना निर्णायक ठरू शकतो.
टीम इंडियाचे वेळापत्रक
| तारीख | प्रतिस्पर्धी संघ | |
| 14 जून | पाकिस्तान | कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सलामी |
| 17 जून | नेदरलँड्स | साखळी फेरीतील दुसरी लढत |
| 21 जून | दक्षिण आफ्रिका | गुणतालिकेसाठी महत्त्वाची मॅच |
| 21 जून | बांगलादेश | आशियाई वर्चस्वाची लढाई |
| 28 जून | ऑस्ट्रेलिया | शेवटचा साखळी सामना (निर्णायक) |
भारताच्या आशा पल्लवित! झिम्बाम्बेला चिरडले, बॅनेटचा एकट्याचा लढा, 72 रन्सने जिंकले
भारताची संभाव्य टीम: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष , भारती फुलमाली, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, राधा यादव, पूजा वस्त्रकार / अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, रेणुका सिंग ठाकूर.