फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रविचंद्रन अश्विनचे चेन्नईमध्ये स्वागत : काल म्हणजेच १८ डिसेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात निकाल अनिर्णयीत राहिला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीनंतर रवी अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. रविचंद्रन अश्विनने सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्याने निवृत्तीची घोषणा केली. आता कालच्या पत्रकार परिषदेनंतर रवी अश्विनने भारतामध्ये परतला आहे. भारतामध्ये येताच ऑफस्पिनरचे चेन्नईत चाहत्यांनी जोरदार स्वागत केले. रवी अश्विनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करत आहेत आणि रवी अश्विनला शुभेच्छा देत आहेत.
#WATCH | Tamil Nadu: People extend a warm welcome to cricketer Ravichandran Ashwin as he arrives at his residence in Chennai, a day after announcing his retirement from International Cricket. pic.twitter.com/rUt5BFX3rA — ANI (@ANI) December 19, 2024
रवीचंद्रन अश्विन म्हणाला की, मी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. मी शक्य तितका वेळ खेळण्याचा प्रयत्न केला तर आश्चर्य वाटणार नाही… क्रिकेटपटू म्हणून रवी अश्विनचा काळ संपला आहे असे मला वाटत नाही. मला वाटते की एक भारतीय क्रिकेटपटू म्हणून माझा काळ संपला आहे, पण क्रिकेटपटू म्हणून माझ्यात अजूनही क्रिकेट शिल्लक आहे. अश्विन पुढे म्हणाला की, जर तुम्ही निवृत्तीबद्दल विचाराल तर ते नेहमीच कठीण असते. तुम्ही तुमच्या निवृत्तीबाबत निर्णय घेत असाल तर ते सोपे नाही. तुमच्या व्यतिरिक्त अनेक लोकांसाठी हा भावनिक क्षण असला तरी माझ्यासाठी खूप दिलासा आणि समाधानाची बाब आहे. रवी अश्विन सांगतो की, माझ्या मनात निवृत्तीची चर्चा खूप दिवसांपासून सुरू होती, पण ते सोपे नव्हते. ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या दिवशी मी माझ्या निवृत्तीचा विचार केला आणि पाचव्या दिवशी त्याची घोषणा केली.
#WATCH | Ravichandran Ashwin says, “…I am going to play for CSK and don’t be surprised if I try and aspire to play for as long as I can. I don’t think Ashwin the cricketer is done, I think Ashwin the Indian cricketer has probably called it time. That’s it.” When asked if… https://t.co/wm7IaTfuGd pic.twitter.com/vaNvUHsNYR — ANI (@ANI) December 19, 2024
भारतीय संघाचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पुढील सामना २६-३० डिसेंबर यादरम्यान खेळवला जाणार आहे. यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला तरच टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्याचा मार्ग कठीण होईल. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने फायनलमध्ये जवळ जवळ स्थान पक्के केले आहे त्यामुळे आता भारताचा संघ की ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान पक्के करणार हे पाहणं मनोरंजक ठरेल.