फोटो सौजन्य - सोशल मिडिया
RCB stampede case : आयपीएल 2026 ची सुरूवात 28 मार्च रोजी होणार आहे. सर्व संघ नव्या सिझनसाठी सज्ज झाले आहेत, त्याचबरोबर मागील काही दिवसांपासून सराव देखील करत आहेत. आता आयपीएल 2026 सुरू व्हायला 5 दिवस शिल्लक असताना आरसीबीच्या संघासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली, आरसीबी संघाने १७ वर्षांचा दुष्काळ संपवून २०२५ मध्ये आपले पहिले विजेतेपद पटकावले. या मोठ्या विजयानंतरचा जल्लोष एका चेंगराचेंगरीमुळे शांत झाला. या भीषण दुर्घटनेत अकरा निष्पाप लोकांचा बळी गेला.
आरसीबीने आता या प्रकरणात एक मोठे पाऊल उचलले आहे. आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी, आरसीबी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) यांनी संयुक्तपणे या पीडितांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबी यावर्षी आपल्या मोहिमेची सुरुवात चिन्नास्वामी स्टेडियमवर करणार आहे. आरसीबीचा हा 18 वर्षानंतर पहिला आयपीएलचा विजय होता पण त्यांना झालेल्या प्रकरणामुळे जास्त वेळ आनंद साजरा करता आला नाही. संघाचा पहिला सामना २८ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होईल. या सामन्यापूर्वी, आरसीबी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने पीडितांना श्रद्धांजली वाहण्याचे नियोजन केले आहे.
स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर एक स्मारक उभारण्यात आले आहे, ज्याचे अनावरण सामन्यापूर्वी केले जाईल. याव्यतिरिक्त, स्टेडियममधील ११ जागा पीडितांसाठी कायमस्वरूपी राखीव ठेवल्या जातील. या जागांची तिकिटे कोणत्याही सामन्यासाठी विकली जाणार नाहीत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरसीबी संघ २८ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी श्रद्धांजली वाहणार आहे.
🚨 A TRIBUTE TO 11 VICTIMS BY RCB. 🚨 – KSCA and RCB will unveil a memorial Plaque at the Chinnaswamy Stadium where they’ll reserve 11 seats in the memory of the stampede victims. (TOI). pic.twitter.com/EhFlE9Fmyr — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 24, 2026
या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या ११ जणांची नावे स्टेडियममधील स्क्रीनवर दाखवली जातील आणि एक मिनिटाचे मौन पाळले जाईल. या प्रयत्नात सनरायझर्स हैदराबाद संघही आरसीबीसोबत सहभागी होईल. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या योजनांना दुजोरा देताना अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांनी टाइम्सला सांगितले, “या दुर्घटनेबद्दल विचार करणे खूप दुःखदायक आहे. आम्ही काही काळापासून एका स्मारकाचा विचार करत होतो आणि ते करणे महत्त्वाचे आहे, असे आम्ही ठरवले.”






