
वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Rohit Sharma सज्ज! (Photo Credit- X)
२०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (ICC Champions Trophy) टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला, तेव्हा क्रिकेट विश्वात अशी चर्चा होती की रोहित शर्माच्याच नेतृत्वाखाली भारत २०२७ चा वनडे वर्ल्ड कप खेळणार. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय क्रिकेटमध्ये वेगाने बदल झाले आणि युवा शुभमन गिलकडे (Shubman Gill) वनडे संघाचे अधिकृत कर्णधारपद सोपवण्यात आले.
🚨 The dedication of Rohit Sharma towards India: Rohit got injured during an IPL match and immediately left the field. He recovered within a week but still took an extra 15 days to ensure he was completely fit to play for India. Now, he has passed his fitness test and is all… pic.twitter.com/Guh0E27fVY — TEJASH 🚩 (@LoyleRohitFan) June 9, 2026
कर्णधारपद गेल्यानंतर रोहित शर्मावर फलंदाज म्हणून प्रत्येक मालिकेत धावा करण्याचा प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धची मागील एकदिवसीय मालिका रोहितसाठी अत्यंत निराशाजनक ठरली होती. अशा परिस्थितीत, आता अफगाणिस्तानविरुद्धच्या तीनही सामन्यांत जर रोहित शर्मा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला, तर त्याला भारतीय वनडे संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. संघ व्यवस्थापन आतापासूनच रोहितचा सक्षम पर्याय (Backup) तयार करण्याच्या तयारीत आहे.
मीडिया रिपोर्ट्स आणि अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेड कोच गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल हे भविष्यातील सलामी जोडी म्हणून यशस्वी जयस्वालकडे (Yashasvi Jaiswal) पाहत आहेत. यशस्वीने आपल्या मागील एकदिवसीय सामन्यात दमदार शतक ठोकून आपण ५० षटकांच्या क्रिकेटसाठी पूर्णपणे तयार असल्याचे सिद्ध केले आहे.
जयस्वालचा सध्याचा आंतरराष्ट्रीय फॉर्म आणि त्याची आक्रमक खेळण्याची शैली गंभीरच्या ‘आक्रमक क्रिकेट’ धोरणाशी तंतोतंत जुळणारी आहे. त्यामुळे जर रोहित शर्माच्या बॅटमधून सातत्याने धावा आल्या नाहीत, तर त्याला डावलून शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल ही युवा जोडी भारतासाठी डावाची सुरुवात करताना दिसेल. तसेच, डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक ईशान किशनला सलामीचा तिसरा पर्याय म्हणून संघात स्थान दिले जाण्याची दाट शक्यता आहे.