
photo - social media
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची सुरुवात संथ झाली. अर्शदीप सिंगने एकही धाव न देता षटक टाकले आणि फिल सॉल्टला पूर्णपणे रोखून धरले. मात्र, दुसऱ्या टोकाकडून जॉस बटलरने झटपट ३६ धावा केल्या, पण युवा प्रिन्स यादवने अचूक यॉर्कर टाकून त्याला त्रिफळाचीत केले. त्यानंतर प्रिन्सने हॅरी ब्रुकला बाद केले. यानंतर,फिल सॉल्टने ताबडतोब फलंदाजी करत आणि ४४ चेंडूंमध्ये ७ चौकार व ३ षटकारांसह ७० धावांची धडाकेबाज खेळी केली. सॅम करनने अखेरीस २४ चेंडूंमध्ये नाबाद ४१ धावांची वेगवान खेळी करून इंग्लंडला २०१ धावांच्या विशाल धावसंख्येपर्यंत पोहोचवले. भारताकडून प्रिन्स यादव आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले.
२०२ धावांच्या विशाल लक्ष्यासमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर एकाही भारतीय फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून राहता आले नाही. जोफ्रा आर्चरच्या वेगामुळे आणि जोश टंगच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे संपूर्ण भारतीय संघ केवळ ७६ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडने हा सामना १२५ धावांनी जिंकला. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत सुमारे १९० धावा केल्या होत्या. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, पण इंग्लंडने दुसरा सामना सहज जिंकला. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने २०० हून अधिक धावा केल्या पण संपूर्ण संघ केवळ ७६ धावाच करू शकला आणि ११.४ षटकांत सर्वबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीही भारतीय संघ सलग पाच सामने गमावलेले नाही.
W, W, W, W! दासुन शनाकाचा ‘डबल हॅट-ट्रिक’ धमाका; ४ बॉलमध्ये ४ विकेट्स घेऊन फिरवला गमावलेला सामना