
भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. आयर्लंड दौऱ्यापासून त्याच्या नेतृत्वर भारताला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे आजचा सामना भारतासाठी महत्वाचा असणार आहे. आजचा सामना भारताने गमावला तर मालिका हरण्याची शक्यता बळावत आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची कसोटी लागणार आहे.
फलंदाजीच्या क्रमात कोणताही बदल नाही
दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने प्लेइंग-11 मध्ये एक बदल करत संजू सॅमसनच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी दिली. वैभवला त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही, पण तिसऱ्या टी-२० मध्येही त्याला संधी दिली जाईल हे निश्चित आहे. या परिस्थितीत सॅमसनला पुन्हा एकदा बाहेर बसावे लागेल. अभिषेक शर्मा वैभवसोबत डावाची सुरुवात करेल. ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल आणि कर्णधार श्रेयस चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. याचा अर्थ भारत फलंदाजीच्या क्रमात कोणताही बदल करणार नाही.
आयपीएलसह गेल्या सहा महिन्यांपासून आपले बहुतेक सामने सपाट खेळपट्ट्यांवर खेळणाऱ्या भारतीय फलंदाजीला इंग्लंडच्या अतिरिक्त बाउन्स, चेंडूची स्विंग आणि सॅम करनसारख्या गोलंदाजांच्या विविधतेसमोर संघर्ष करावा लागत आहे. कर्णधार श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनी निश्चितच काही धावा केल्या आहेत, पण ते दोघेही हे इंग्लिश गोलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवू शकले नाहीत. भारताने गेल्या दोन सामन्यांमध्ये १८९ आणि १९० धावा केल्या, पण दोन्ही वेळा धावसंख्या किमान २५ ते ३० धावांनी कमी पडली.
भारत: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.
झालं, संपलं सगळं! इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यांआधी Team India ला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू बाहेर
इंग्लंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बेंटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोश टंग, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर