
श्रेयस अय्यर असणार भारतीय टी 20 संघाचा कर्णधार
बीसीसीआयने केली मोठी घोषणा
भारतीय संघ इंग्लंड अन् आयर्लंड दौऱ्यावर जाणार
Team India T20 Captain: भारताचा संघ लवकरच इंग्लंड आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यरला भारताच्या टी 20 संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यावर श्रेयस अय्यरने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला श्रेयस अय्यर?
मला लहानपणापासूनच आव्हानांचा सामना करण्यास आवडते. मला माझे व्यक्तिमत्व बदलण्याची गरज नाहीये. मी आधी होतो तसेच राहण्याचा माझा प्रयत्न आहे. कोणासारखं होण्यासाठी मी प्रयत्न करणार नाही. मुंबईत क्रिकेटचा स्तर खूप मोठा आहे. प्रतिस्पर्धी यांचे आव्हान देखील मोठे असते. माझा विचार नेहमी जिंकण्याचा असतो.
बीसीसीआयने पत्रकार परिषद घेत भारताच्या इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यरला टी 20 संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरने पंजाब किंग्जचे नेतृत्व केले होते. या हंगामात आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरने शानदार प्रदर्शन केले होते. त्यामुळे त्याचा फॉर्म बघून श्रेयस अय्यरला भारताच्या टी 20 संघाचे कर्णधार पद देण्यात आले आहे.
IND Vs AFG Live: एक डाव, 300 रन्स आणि ऐतिहासिक विजय; मुल्लानपूरमध्ये Team India चा धुमाकूळ
Shreyas Iyer सांभाळणार T20 चा कारभार
बीसीसीआयने श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून घोषित केले आहे. तर तिलक वर्माला उपकर्णधार म्हणून जबाबदारी दिली गेली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान देण्यात आले आहे. टीम इंडिया इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध टी – 20 सामना खेळणार आहे.
आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटविण्यात आले आहे. तर श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून संधी देण्यात आली आहे. या दोन्ही सिरिजसाठी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची देखील निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वैभव भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. आयपीएलमधील उत्कृष्ट नेतृत्व आणि कामगिरीच्या जोरावर श्रेयस अय्यर आता भारताचा पूर्णवेळ टी-२० कर्णधार बनला आहे. मागील काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या सूर्यकुमार यादवला टी-२० संघातून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
‘सरपंच’ इज बॅक! Shreyas Iyer सांभाळणार T20 चा कारभार ; इंग्लंड-आयर्लंडचे धाबे दणाणले
भारताचा संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार ), तिलक वर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, प्रिन्स यादव