Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : नाणेफेकीत शुभमन गिलची झोळी रिकामी! टीम इंडियाचा टॉस हरण्याचा नकोसा विक्रम

शुभमन गिलने बर्मिंगहॅमच्या मैदानात कसोटी कर्णधाराच्या रुपात विजयाचे खाते उघडले. पण तिसऱ्या सामन्यात टॉस जिंकण्यात तो पुन्हा अपयशी ठरला. टॉस वेळी सलग तिसऱ्यांदा त्याच्या पदरी निराशा आली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 12, 2025 | 05:00 PM
IND vs ENG: Shubman Gill's bag is empty in the toss! Team India's unfortunate record of losing the toss

IND vs ENG: Shubman Gill's bag is empty in the toss! Team India's unfortunate record of losing the toss

Follow Us
Follow Us:

IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु आहे. यामध्ये भारत आणि इंग्लंड हे ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहेत. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात खेळला जात आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एजबॅस्टनच्या मैदानातील ऐतिहासिक विजयासह लीड्सच्या मैदानातील पराभावची परतफेड करत ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. शुभमन गिलने बर्मिंगहॅमच्या मैदानात कसोटी कर्णधाराच्या रुपात विजयाचे खाते उघडले. पण तिसऱ्या सामन्यात टॉस जिंकण्यात तो पुन्हा अपयशी ठरला. टॉस वेळी सलग तिसऱ्यांदा त्याच्या पदरी निराशा आली.

यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या नावे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून सलग सर्वाधिक वेळा टॉस गमावण्याचा नकोसा विक्रम नोंदवला गेला. गिलने लॉर्ड्सवर टॉस गमावताच टीम इंडियाच्या नावे आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात मिळून सर्वाधिक वेळा टॉस गमावण्याचा नकोसा वर्ल्ड नावे झाला आहे. ३१ जानेवारी २०२५ ते १० जुलै २०२५ या कालावधीत भारतीय संघाने टी-२०, वनडे आणि कसोटीत मिळून सलग १३ वेळा टॉस गमावला आहे. याआधी हा रेकॉर्ड वेस्ट इंडिजच्या नावे होता. कॅरेबियन संघाने २ फेब्रुवारी १९९९ ते २१ एप्रिल १९९९ या कालावधीत सलग १२ वेळा टॉस गमावला होता.

हेही वाचा : IND vs ENG : पत्रकार परिषदेमध्ये जर्नलिस्टचा फोन अन्…जसप्रीत बुमराहच्या उत्तरावर कोणाचेच हसु थांबेना! पहा Video

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सातत्याने सर्वाधिक वेळा टॉस गमावणारे संघ संघ किती वेळा

संघ            किती वेळा टॉस गमावला                       केव्हा                                                          कर्णधार

भारत                        १३                           ३१ जानेवारी ते १० जुलै २०२५                           रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल

वेस्ट इंडिज                 १२                           २ फेब्रुवारी १९९९ ते २१ एप्रिल १९९९               जेम्स अडम्स, ब्रायन लारा आणि कार्ल हुपर

इंग्लंड                        ११                           १७ डिसेंबर २०२२ ते १२ मार्च २०२३                  जोस बटलर आणि बेन स्टोक्स

न्यूझीलंड                    १०                              १६ फेब्रुवारी १९७२ ते ७ जून १९७३                बेव्हन कॉगडों, ग्रॅहाम डाउलिंग

हेही वाचा : IND vs ENG : आऊट की नाॅट आऊट? जो रुट घेतलेला कॅच वादात! पंचांवर फसवणुकीचा आरोप

जसप्रीत बुमराहने लॉर्ड्सवर रचला इतिहास..

भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. लीड्स कसोटीनंतर या सामन्यात जसप्रीत बुमराहने जोरदार पुनरागमन केले आहे. जसप्रीत बुमराहने लॉर्ड्स कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेऊन इंग्लंड संघाचे कंबरडे मोडले आणि इंग्लंडला ३८७ धावांवर रोखण्यात मोठी भूमिका बजावली आहे. या कामगिरीसह बुमराहने लॉर्ड्स येथे पाच विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे. तोपरदेशात एका डावात सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. जसप्रीत बुमराहने घराबाहेर १३ वेळा एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने कपिल देवला पिछाडीवर टाकून ही खास कामगिरी केली आहे. कपिल देवने घराबाहेर १२ वेळा एका डावात पाच विकेट्स घेण्याची किमया साधली होती. आता घराबाहेर सर्वाधिक विकेट्स घेण्याचा हा विक्रम बुमराहच्या नावावर जमा झाला आहे.

Web Title: Shubman gills bag is empty in the toss team indias unfortunate record of losing the toss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • India Won The Toss
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.