आज भारत विरूद्ध श्रीलंका (India Vs Sri Lanka) यांच्यात महिला आशिया चषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. १ वाजता अंतिम सामन्याचा (Final Match) टॉस पार पडला असून यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना अगदी थोड्याच वेळात सुरु होणार आहे.
महिला आशिया स्पर्धेत (Women Asia Cup 2022) भारतीय संघाची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली असून संघाने या हंगामातील केवळ एक सामना वगळता सर्व सामने जिंकले आहेत. पहिल्या गट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताचे पारडे श्रीलंकेपेक्षा काही अंशी वरचढ आहे.
भारतीय महिला संघ :
शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, दयालन हेमलता, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकिपर), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रेणुका सिंह, राजेश्वरी गायकवाड.
श्रीलंका महिला संघ :
चमारी अट्टापट्टू (कर्णधार), अनुष्का संजीवनी (विकेटकिपर), हर्षिता मडावी, हसिनी परेरा, निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहरी, मलशा शेहानी, ओशादी रणसिंघे, सुगंधिका कुमारी, इनोका रणवीरा, अचिनी कुलसूरिया.






