Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suryakumar Yadav ने मोडला Rohit Sharma चा विश्वविक्रम! बनला जगातील सर्वात यशस्वी T20 कर्णधार

सूर्यकुमार यादवने आतापर्यंत ४७ सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी भारताने ३८ सामने जिंकले आहेत आणि फक्त ७ सामने गमावले आहेत. हिटमनच्या नेतृत्वाखाली भारताने ६२ पैकी ५० सामने जिंकले होते

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 19, 2026 | 11:14 AM
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील ३६ व्या सामन्यात नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव केला. या विजयासह, भारताने ग्रुप स्टेजमध्ये सलग चौथा विजय मिळवला आणि सुपर ८ मध्ये प्रवेश केला. या विजयासह सूर्यकुमार यादवने एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. सूर्याने आता टी-२० क्रिकेट इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय टक्केवारीचा विक्रम केला आहे, या बाबतीत त्याने माजी कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले आहे. नेदरलँड्सविरुद्ध कालच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करून भारताने १९४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. 

या धावसंख्येचा पाठलाग करताना नेदरलँड्सला फक्त १७६ धावा करता आल्या. भारताच्या विजयाचा नायक शिवम दुबे होता, ज्याने केवळ धमाकेदार अर्धशतकच केले नाही तर दोन विकेटही घेतल्या. भारताने हा सामना जिंकल्याने, सूर्यकुमार यादवचा विजयाचा टक्का ८०.८५ पर्यंत वाढला आहे, जो माजी कर्णधार रोहित शर्माच्या ८०.६५ पेक्षा थोडा चांगला आहे.

‘हैप्पी बर्थडे माई प्रिंसेस’….माहिकाच्या वाढदिवशी रोमँटिक फोटो शेअर करुन हार्दिक पांड्याने केला प्रेमाचा वर्षाव

सूर्यकुमार यादवने आतापर्यंत ४७ सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी भारताने ३८ सामने जिंकले आहेत आणि फक्त ७ सामने गमावले आहेत. रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर, हिटमनच्या नेतृत्वाखाली भारताने ६२ पैकी ५० सामने जिंकले होते, तर १२ सामने गमावले होते. जर आपण इतर भारतीय कर्णधारांबद्दल बोललो तर, एमएस धोनीचा विजयाचा टक्का ५८.३३ होता, तर विराट कोहलीचा ६४ होता.

टी२० इतिहासात कर्णधार म्हणून सर्वोत्तम विजय टक्केवारी:

सूर्यकुमार यादव – ८०.८५%.

रोहित शर्मा – ८०.६५%.

असगर अफगाण – ८०.३९%

२०२६ च्या टी२० विश्वचषकात भारताची मोहीम आतापर्यंत प्रभावी राहिली आहे. लीग फेरीतील चारही सामन्यामध्ये विजय मिळवल्यानंतर, भारत सुपर ८ मध्ये पोहोचला आहे. आता, टीम इंडियाची नजर सेमीफायनलवर आहे.

INDW vs AUS W, T-20 Series : अजिंक्य आघाडी मिळवण्याकडे भारताचे लक्ष्य! ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज दूसरा टी-२० सामना रंगणार

नेदरलँड्सविरुद्धचा सामना जिंकून, भारताने टी-२० विश्वचषकात सलग १२ सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला आहे. २०२२ च्या टी-२० विश्वचषकात भारताला इंग्लंडविरुद्ध शेवटचा उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. 2024 मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियाला एकही पराभव पत्करावा लागलेला नाही. अशी आशा आहे की या विश्वचषकातही भारत एकही सामना गमावणार नाही आणि टीम इंडिया आपले जेतेपद राखण्यात यशस्वी होईल.

Web Title: Suryakumar yadav breaks rohit sharma world record became the most successful t20 captain in the world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • cricket
  • Rohit Sharma
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Crime News: खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद; 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
1

Crime News: खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद; 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

MI Vs RR Live: मुंबईचा ‘राजा’ की राजस्थानचा ‘वैभव’; हेड टू हेड रेकॉर्ड्सनुसार ‘किंग’ कोण?
2

MI Vs RR Live: मुंबईचा ‘राजा’ की राजस्थानचा ‘वैभव’; हेड टू हेड रेकॉर्ड्सनुसार ‘किंग’ कोण?

BCCI चा ऐतिहासिक निर्णय, Vaibhav Sooryavanshi साठी बदलले नियम? लवकरच दिसणार Team India च्या जर्सीत
3

BCCI चा ऐतिहासिक निर्णय, Vaibhav Sooryavanshi साठी बदलले नियम? लवकरच दिसणार Team India च्या जर्सीत

IPL 2026 : Hardik Pandya मैदानात कधी परतणार? Mumbai Indians च्या कॅप्टन्सीच्या पेचात मोठी अपडेट
4

IPL 2026 : Hardik Pandya मैदानात कधी परतणार? Mumbai Indians च्या कॅप्टन्सीच्या पेचात मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.