
पाकिस्तानच्या कॅप्टनने बांगलादेशींबद्दल काढले उद्गार (फोटो सौजन्य - X.com)
याचदरम्यान पाकिस्तानच्या कॅप्टनने बांगलादेशबाबत मोठे विधान केले आणि त्यांना आपले भाऊ म्हटले आहे. सध्या भारतासह बांगलादेशचे संबंध चांगले नाहीत. ‘दुश्मन का दुश्मन दोस्त’ या धर्तीवर आता पाकिस्तानने बांगलादेशच्या खेळाडूंना आपले भाऊ मानले आहे. मात्र याचे परिणाम आता पुढे काय होणार ते पहावे लागतील.
काय म्हणाला सलमान अली आगा
पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा या कॅप्टन्स डे दरम्यान म्हणाला की, “बांगलादेशी आमचे भाऊ आहेत.” रेव्हस्पोर्ट्झमधील वृत्तानुसार, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याने स्पर्धेपूर्वी कर्णधारांच्या बैठकीत म्हटले होते, “बांगलादेशी आमचे भाऊ आहेत. पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही आभारी आहोत.” ते स्पर्धेत खेळणार नाहीत ही खेदाची गोष्ट आहे.
निर्देशाचे पालन करणाऱ्या असल्याचेही म्हटले
यापूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा यांनी सोमवारी सांगितले होते की खेळाडू सरकार किंवा क्रिकेट बोर्डाच्या कोणत्याही निर्देशांचे पालन करतील, ज्यामध्ये १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे भारताविरुद्ध होणाऱ्या हाय-प्रोफाइल टी-२० विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकणे समाविष्ट आहे. लाहोरहून कोलंबोला जाण्यापूर्वी सलमानने माध्यमांना सांगितले की, रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर संघ व्यवस्थापकाने संघाला या निर्णयाची माहिती दिली.
बोर्डाशी करारबद्ध
“आम्ही बोर्डाशी करारबद्ध खेळाडू आहोत आणि सरकार आणि बोर्डाने घेतलेल्या निर्णयाशी सर्व खेळाडू सहमत आहेत.” सलमानने स्पष्ट केले की टी-२० विश्वचषक केवळ भारताविरुद्ध खेळण्यापुरता मर्यादित नाही आणि संघ प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करून स्पर्धा जिंकण्याच्या उद्देशाने श्रीलंकेला जात आहे. त्यांनी सांगितले की त्यांचे तीन गट सामने शिल्लक आहेत आणि पुढील फेरीत पात्र होण्यासाठी ते सर्व जिंकण्याचा प्रयत्न करतील.
टीम इंडियाची T20 World Cup मध्ये आतापर्यंत कशी राहिली कामगिरी? एका क्लिकवर वाचा संपूर्ण इतिहास