टीम इंडियाची T20 World Cup मध्ये आतापर्यंत कशी राहिली कामगिरी? (Photo Credit - X)
टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच हंगामात भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला. अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून भारताने पहिले जेतेपद पटकावले. भारताच्या १५७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १५२ धावांत गारद झाला आणि भारताने विश्वचषकावर नाव कोरले.
T20 World Cup 2026 चॅम्पियन टीम होणार मालामाल! उपविजेत्यालाही मिळणार मोठी रक्कम
विराट कोहलीच्या बॅटने या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला होता. भारताने अंतिम फेरी गाठली, मात्र श्रीलंकेविरुद्धच्या फायनलमध्ये १३० धावांचे छोटे आव्हान भारताला महागात पडले आणि भारताचे दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले.
दुबईत झालेल्या या स्पर्धेत भारताला गट फेरीतच पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानने भारताला पहिल्यांदाच हरवल्याने टीम इंडियाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले.
१७ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवत रोहित शर्माच्या सैन्याने २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत धूळ चारली. या विजयासह भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. सुर्यकुमार यादवचा ‘तो’ कॅच आणि हार्दिक पांड्याची शेवटची ओव्हर क्रिकेट इतिहासात अजरामर झाली.
| वर्ष | यजमान | कामगिरी | मुख्य कर्णधार |
| २००७ | दक्षिण आफ्रिका | विजेता (Champion) | एम.एस. धोनी |
| २०१४ | बांगलादेश | उपविजेता (Finalist) | एम.एस. धोनी |
| २०१६ | भारत | उपांत्य फेरी (Semi-Final) | एम.एस. धोनी |
| २०२१ | ओमान / UAE | गट फेरी (Group Stage) | विराट कोहली |
| २०२२ | ऑस्ट्रेलिया | उपांत्य फेरी (Semi-Final) | रोहित शर्मा |
| २०२४ | वेस्ट इंडिज / अमेरिका | विजेता (Champion) | रोहित शर्मा |






