
rinku-singh-
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याच्या एक दिवस आधी पत्रकार परिषद झाली. यावेळी भारतीय संघाचे बॅटिंग कोच सितांशु कोटक यांना रिंकू सिंगबद्दल प्रश्न विचारला असता, त्यांनी स्पष्ट केलं की, आज संध्याकाळपर्यंत रिंकू संघात परतण्याची अशी अपेक्षा आहे. त्यानंत भारतीय संघाच्या मागील पराभवाबाबत प्रश्न विचारला, त्यावर बोलताना त्यांनी विश्वचषक मायदेशी होत आहेत त्याचं संघावर दडपण आहे आणि संघाकडून अपेक्षाही तितक्याच आहेत. ही सगळी परिस्थिती आम्ही सकारात्मकरित्या हाताळत आहोत. आम्हाला आता फक्त मुमेंट्मची गरज आहे.
T20 विश्वचषकात टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माची कामगिरी आतापर्यंत खूपच खराब राहिली आहे. त्याबाबत जेव्हा सितांशु कोटकला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितलं की, जेव्हापासून अभिषेक आजारपणानंतर परतला आहे, तेव्हापासून त्याला त्याची लय परत मिळू शकलेली नाही, पण तो आपला जुना फॉर्म लवकरच परत जेव्हापासून अभिषेक आजारपणानंतर परतला आहे, तेव्हापासून त्याला त्याची लय परत मिळू शकलेली नाही, पण तो आपला जुना फॉर्म परत मिळवेल.
सेमीफायनलसाठी पात्र ठरण्यासाठी भारतासमोर दोन संघांंचं आव्हानं आहे. भारताने साउथ आफ्रिकासोबत खेळला गेलेला पहिला सामना गमावला असल्याने पुढील दोन्ही सामने जिंकणं फार आवश्यक आहे.जर भारत वेस्टइंडीज आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांचा पराभव करेल तर त्याचे ४ अंक होतील. जर साउथ आफ्रिका त्यांचे उर्वरित सामने जिंकतील तर भारत आणि साउथ आफ्रिका दोन्ही संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील. जर भारत दोन्ही मॅच जिंकेल आणि साउथ आफ्रिका त्यांचा एक सामना गमावतील तर ३ संघांचे अंक सारखे होतील. अशा परिस्थितीत कोणते संघ सेमीफायनल खेळतील हे नेट रन रेटवरुन ठरवलं जाईल. भारतने आपले दोन्ही सामने जिंकले आणि साउथ आफ्रिकेला आपल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला तर भारत आणि वेस्टइंडीज हे दोन्ही संघन सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.