
आयपीएल 2026 चा अंतिम सामना अहमदाबादमध्ये होणार
शुभमन गिल अन् साई सुदर्शन गुजरात टायटन्सची मदार
दोन्ही संघ दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी उत्सुक
Tata IPL 2026 GT Vs RCB Final Live Updates: आज गुजरात टायटन्समध्ये आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघात आयपीएल 2026 चा अंतिम सामना होणार आहे. दोन्ही संघ दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याच्या दृष्टीने मैदानात उतरणार आहेत. दरम्यान दोन्ही संघांनी जोरदार तयार केली आहे. मात्र आरसीबीचे गोलंदाज गुजरातच्या एका महत्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. त्यात त्यांना यश आले तर गुजरातच्या अडचणी वाढवू शकतात.
आजचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. फायनल असल्यामुळे अहमदाबादमध्ये चाहते मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. आज संपूर्ण स्टेडियम भरले जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरसीबीकडून विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, रजत पाटीदार आणि गुजरात कडून शुभमन गिल, साई सुदर्शन, रबाडा , सिराज असे फॉर्ममध्ये असणारे खेळाडू खेळताना दिसून येतील.
गुजरातची दुखती नस कोणती?
आयपीएल 2026 मध्ये गुजरात टायटन्सचे प्रमुख खेळाडू सोडल्यास फलंदाजीत संघ अपयशी ठरला आहे. गुजरातचा डोलारा केवळ कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीवर अवलंबून असल्याचे दिसून आले. मात्र त्यांच्यानंतर कोणत्याही फलांडाजाने साजेशी खेळी केळली नाहीये. हा गुजरातसमोरचा मोठा धोका आहे.
गुजरातची मधली फळी या पूर्ण सीझनमध्ये संघर्ष करताना दिसली आहे. जेव्हा जेव्हा गिल आणि सुदर्शन स्वस्तात बाद झाले , तेव्हा टायटन्सचा संघ गडबडला आहे. क्वालिफायर 1 मध्ये असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे आज आरसीबीचे गोलंदाज पूर्ण नियोजन करून मैदानात उतरतील. त्यांनी पॉवर प्ले मध्ये गिल आणि सुदर्शन पैकी एक विकेट मिळवली तरी गुजरात अडचणीत येऊ शकते. आरसीबीची मुख्य मदार भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवूड असणार आहे.
RCB vs GT Final पूर्वीच गुजरातला वादळाचा तडाखा
‘RCB जिंकली तर टक्कल…’; IPL Final च्या आधी मजेशीर Video Viral; गुजरातविरुद्ध होणार रोमांचक सामना
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2026 चा अंतिम सामना खेळला जाईल. यासाठी दोन्ही संघ सामन्यासाठी अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत, परंतु अंतिम सामन्यापूर्वी गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. अंतिम लढतीआधी गुजरात संघाच्या प्रवासात वादळामुळे विलंब झाला, त्यामुळे त्यांना अंतिम सामन्याच्या तयारीसाठी २४ तासांपेक्षा कमी वेळ मिळाला आहे. मीडिया वृत्तानुसार, वादळी हवामानामुळे गुजरात टायटन्सच्या प्रवासाच्या योजनांमध्ये व्यत्यय आला असून, रविवारच्या अंतिम सामन्यापूर्वी त्यांच्या अहमदाबादमधील आगमनास विलंब झाला आहे.