
photo- social media
France Beat Morocco: एम्बाप्पे-डेम्बेलेचा जलवा! फ्रान्सने मोरोक्कोला हरवत मारली सेमीफायनलमध्ये धडक
पुरुषांच्या २०२६ ऑलिम्पिक पात्रतेसंदर्भात आयसीसीने जारी केलेल्या नियमांनुसार, आशिया, युरोप, आफ्रिका आणि ओशेनियामधून प्रत्येकी एका अव्वल मानांकित संघाला थेट पात्रता मिळेल, तर यजमान देश म्हणून अमेरिका आधीच थेट पात्र ठरली आहे. यानंतर, २०२६ च्या अखेरपर्यंत प्रत्येक खंडातील अव्वल मानांकित संघाला थेट पात्रता मिळेल. सहावा संघ पात्रता फेरीतून निश्चित केला जाईल. भारतीय संघ सध्या आशियातील टी-२० सांघिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, परंतु अलीकडील कामगिरीतील घसरण सुरू राहिल्यास संघाच्या क्रमवारीतही घसरण होऊ शकते. या परिस्थितीत पाकिस्तानला फायदा होऊ शकतो. भारतीय संघ सध्या एकूण २६९ रेटिंग गुणांसह टी-२० सांघिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तर दुसरीकडे, पाकिस्तानी संघ एकूण २४० रेटिंग गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत, जर भारतीय संघाने आपल्या कामगिरीत सुधारणा केली नाही आणि वर्षाअखेरीस पाकिस्तानने चांगली कामगिरी केली, तर तो आशियातील अव्वल क्रमांकाचा संघ बनू शकतो आणि त्याला २०२८ ऑलिम्पिकसाठी थेट पात्रतेचे तिकीट मिळेल.
क्रिकेटचा २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. पात्रतेच्या नियमांनुसार, जर भारतीय पुरुष संघाला ऑलिम्पिकसाठी थेट पात्र व्हायचे असेल, तर त्यांना २०२६ च्या अखेरपर्यंत आशियाई संघांमध्ये आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल स्थानी राहावे लागेल. आयसीसी टी-२० संघ क्रमवारीत सध्या अव्वल स्थानी असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा थेट पात्रतेचा मार्ग जवळपास मोकळा झाला होता. मात्र, इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तीन सामने गमावल्यानंतर, भारतीय संघाचे अव्वल स्थान आता धोक्यात आले असून, ऑलिम्पिकसाठीच्या थेट पात्रतेबाबतचा तणावही वाढला आहे.
इंग्लंडविरुद्धची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका संपल्यानंतर, भारतीय संघ या वर्षाच्या अखेरपर्यंत या फॉरमॅटमध्ये आणखी चार द्विपक्षीय मालिका खेळेल. यामध्ये जुलै महिन्याच्या अखेरीस झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची मालिका आणि त्यानंतर ऑक्टोबरच्या सुरुवातीला मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेचा समावेश आहे. भारतीय संघ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळेल, त्यानंतर वर्षाच्या अखेरीस मायदेशात श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळेल.