
photo- social media
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरसीबीच्या विजयानिमित्त यावेळी विक्ट्री परेड (Victory Parade) निघणार नाही. चाहत्यांना संघाचा विजय इनडोअर (घराच्या आत) साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विजयानंतर RCB ने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांना ‘घरी राहून सुरक्षितपणे विजय साजरा करा,’ असे आवाहन संघाने केले. गेल्या वर्षी झालेल्या दुर्घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेता यंदा कोणतीही जोखीम घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले. RCB व्यवस्थापनाने यंदा शांत आणि मर्यादित पद्धतीने विजय साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरसीबीच्या एका सूत्राने वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘बंगळुरूमध्ये कोणत्याही प्रकारचा जल्लोष होण्याची शक्यता खूपच कमी आहे. काही विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यात आली आहेत आणि आम्हाला त्यांचे पालन करावे लागेल.’ दरम्यान, बंगळुरु शहर पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंह म्हणाले, ‘आम्ही कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक उत्सवाला परवानगी देणार नाही. जर कोणाला उत्सव साजरा करायचा असेल, तर ते घराच्या आत करू शकतात.’
Good morning, 12th Man Army. ❤️ Safe to say this is the best way to start a new month? 😉🏆#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2026 pic.twitter.com/2fRgWxGgH6 — Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 1, 2026
What a night. What a feeling. 🥹 To every member of the RCB nation, congratulations. This is YOUR win. 🏆❤️ As the celebrations begin, let’s be responsible. 🙌 Best way to celebrate is with your loved ones. Relive the memories, and enjoy this special moment from the comfort of… pic.twitter.com/hdGO3n115a — Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 31, 2026
बंगळुरू पोलिसांनी अंतिम सामन्यापूर्वीच सार्वजनिक सेलिब्रेशन, बाइक रॅली आणि मोठ्या गर्दीवर निर्बंध घातले होते. चाहत्यांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये, असे आवाहनही करण्यात आले होते. पोलिसांनी अंतिम सामन्यापूर्वीच शहरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली होती. विशेषतः एम. चिन्नास्वामी स्टेडियम परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
चिन्नास्वामी स्टेडियमजवळ असलेल्या लोक भवन येथे कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. राज्यभरातून, अनेक प्रमुख व्यक्तींसह मोठी गर्दी अपेक्षित आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाईल, ज्यामुळे राज्य पोलीस विभागाला अशा आणखी एका हाय-व्होल्टेज कार्यक्रमासाठी सुरक्षा पुरवणे कठीण होईल. ही परिस्थिती लक्षात घेऊन, आरसीबी व्यवस्थापनाने बंगळुरुमध्ये सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन वेळचे आयपीएल विजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) संघाने गेल्या वर्षीच्या विजयातून धडा घेतला असून, या वेळी विजय मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करून आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले. मात्र, या वेळी बंगळुरुमध्ये विजय मिरवणूक न काढण्याचा निर्णय फ्रँचायझीने घेतला आहे. २०२५ मध्ये RCB ने पहिले आयपीएल विजेतेपद जिंकल्यानंतर बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सेलिब्रेशनदरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत अनेक ११ चाहत्यांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर प्रशासन आणि पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. याच पार्श्वभूमीवर यंदा कोणताही धोका पत्करायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
अंतिम सामन्यात विराट कोहलीने Virat Kohli याने दमदार अर्धशतक झळकावत RCB च्या विजयात मोठी भूमिका बजावली. त्याच्या शानदार खेळीमुळे संघाने सलग दुसरे विजेतेपद पटकावले.