भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चेन्नई येथील ऐतिहासिक एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय संघाने या मैदानावर १५ एकदिवसीय सामने खेळले असून, त्यापैकी आठ जिंकले आहेत, सहा गमावले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. या खेळपट्टीवर चेंडूला चांगला टर्न मिळतो. त्यामुळे फिरकी गोलंदाजांचे खेळपट्टीवर वर्चस्व राहण्याची शक्यता आहे.
भारत या मालिकेकडे २०२७ च्या विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून पाहत आहे. पहिल्या सामन्यात गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे यांनी पदार्पण केले आणि प्रत्येकी ३ विकेट्स घेतले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादवला पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने २ विकेट्स घेतले. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वॉशिंग्टन सुंदरच्या जागी हर्ष दुबेला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. सुंदरने लखनौमध्ये १९ चेंडूंमध्ये १९ धावा केल्या होत्या आणि आपल्या ७ षटकांच्या स्पेलमध्ये २४ धावांत एक विकेटही घेतला होता.
अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना माजी कर्णधार रोहित शर्मासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. धर्मशाळा येथे १६ धावांवर धावबाद झाल्यानंतर, त्याने दुसऱ्या सामन्यात ४८ धावांची वेगवान खेळी केली होती. मात्र, तिसऱ्या सामन्यात व्यवस्थापनाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.
TG20 लीगवर मोठा वाद; विजय देवरकोंडा, सिराज आणि तिलक वर्माला कायदेशीर नोटीस






