
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
RCB चे खेळाडू नेहमीच्या उत्साहाऐवजी एका गंभीर भावनेने मैदानात उतरणार आहेत. हातावर काळ्या पट्ट्या ११ चाहत्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बांधणार आहे. गेल्या हंगामात संघाने विजेतेपद पटकावल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या ‘विजय मिरवणुकी’दरम्यान, स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांना याद्वारे श्रद्धांजली वाहण्याचा हा उद्देश आहे.
एका निवेदनात RCB ने म्हटले आहे की, “रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे RCB कुटुंबातील अशा ११ सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करेल, ज्यांचा एका दुर्दैवी घटनेत अंत झाला.” या निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, “आदरभाव व्यक्त करण्यासाठी, खेळाडू ‘वॉर्म-अप’ सत्रादरम्यान ११ नंबरची असलेली सरावाची जर्सी परिधान करतील आणि सामन्यादरम्यान हातावर काळ्या पट्ट्या बांधतील.”
निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, त्या चाहत्यांच्या सन्मानार्थ, स्टेडियममधील ११ जागा रिकाम्या ठेवल्या जातील. अशा प्रकारे, फ्रँचायझी विविध गोष्टींमधून त्या चाहत्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे RCB आपले ५ ‘घरचे सामने’ बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहे. संघाचे उर्वरित २ मॅचेस home matches रायपूर येथे खेळवले जातील. बंगळुरू किती आणि कोणते घरचे सामने खेळणार आहे, या सामन्यांच्या वाटपाची घोषणा IPL च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करतानाच करण्यात आली होती. त्या घोषणेमध्ये असेही नमूद करण्यात आले होते की, बंगळुरूमध्ये IPL चे सामने आयोजित करायचे की नाही, याविषयीचा अंतिम निर्णय कर्नाटक सरकारने स्थापन केलेल्या एका तज्ज्ञ समितीद्वारे घेतला जाईल. स्टेडियमच्या सर्व बाबींची पाहणी केल्यानंतर, अखेर तो निर्णय RCB च्या बाजूने घेण्यात आला.
विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), टिम डेव्हिड, जितेश शर्मा (विकेटकीपर), क्रुणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जेकब डफी, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, व्यंकटेश मलेशिया, विकेटकीपर, विकेटकीपर, विनयेश शर्मा, जेकब डफी. ओस्तवाल, अभिनंदन सिंग, जेकब बेथेल, जॉर्डन कॉक्स, स्वप्नील सिंग, कनिष्क चौहान, सात्विक देसवाल.