
WTC पॉईंट टेबलमध्ये मिळाला नाही एकही गुण? जाणून घ्या कारण (Photo Credit - X)
या सामन्यात मोठा विजय मिळवूनही, टीम इंडियाला ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ (WTC) गुणतालिकेत कोणताही फायदा झालेला नाही. या सामन्याचा WTC च्या गुणतालिकेवर कोणताही परिणाम झालेला नाही कारण ही लढत चॅम्पियनशिपचा भाग नव्हती. सध्या नऊ संघ WTC मध्ये सहभागी आहेत आणि त्यात अफगाणिस्तानचा समावेश नाही; भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना हा केवळ एक मैत्रीपूर्ण सामना होता. शिवाय, WTC मालिकांमध्ये साधारणपणे किमान दोन कसोटी सामन्यांचा समावेश असतो, तर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात केवळ एकच कसोटी सामना खेळला गेला.
Setting a new benchmark 📈 Marking our return to Test cricket with our biggest ever innings victory 🇮🇳 Scorecard ▶️ https://t.co/Au50EfVM30#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/NVz3lIAZ3E — BCCI (@BCCI) June 8, 2026
IND Vs AFG: बॅटिंग न करताही संघ कसा जिंकतो? काय आहे Follow-On चा नियम? एकदा वाचाच…
टीम इंडिया सध्या WTC गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. या आवृत्तीत संघाने नऊ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये चार विजय, चार पराभव आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारताची सध्याची विजयाची टक्केवारी ४८.१५% इतकी आहे. या आवृत्तीच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्याकरिता, भारताला अव्वल दोन संघांमध्ये स्थान मिळवणे आवश्यक आहे. गुणतालिकेवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, ऑस्ट्रेलिया सध्या पहिल्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका ७५% विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे.
मानव सुथारने आपल्या कसोटी कारगिर्दीची ऐतिहासिक सुरुवात केली आहे. मुल्लांपूर येथे सुरु असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात मानव सुथारने २२ ओव्हरमध्ये ६ विकेट्स घेत इतिहास रचला आहे. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ केवळ १५२ धावांत गारद झाला. आतापर्यंत केवळ १० भारतीय गोलंदाजांनी ही कामगिरी केली आहे. इतकेच नव्हे, तर भारतीय संघासाठी ही कामगिरी करणारा तो सातवा फिरकी गोलंदाज ठरला. भारतासाठी कसोटी पदार्पणात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम नरेंद्र हिरवाणी यांच्या नावावर आहे.
Manav Suthar: पहिल्याच कसोटीत 6 विकेट्स, मानव सुथारने इतिहास रचत दिग्गजांना टाकले मागे