२०२६ च्या महिला आशिया कपचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी, तर अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. टी-२० म्हणजेच २० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या महिला आशिया कपची ही सहावी आवृत्ती असेल. या आशिया कपमध्ये एकूण आठ संघ सहभागी होत आहेत . यामध्ये भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, मलेशिया, थायलंड आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या देशांच्या संघांचा समावेश आहे. अफगाणिस्तानचा महिला संघ क्रिकेट खेळत नाही. सध्या श्रीलंकेचा संघ गतविजेता आहे.
भारतीय संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तिने टी-२० विश्वचषकातही संघाचे नेतृत्व केले होते. यासाठी भारतीय संघ आधीर जाहीर करण्यात आला. विशेष बाब, म्हणजे आशियाई खेळ १७ ते २४ सप्टेंबर दरम्यान जपानमध्ये होणार आहेत. याचा अर्थ आशिया कप संपल्यानंतर आणि आशियाई खेळ सुरू होण्यापूर्वी फारसा वेळ शिल्लक नाही.
या स्पर्धेत भारतीय संघ आपला पहिला सामना ३० ऑगस्ट रोजी थायलंडविरुद्ध खेळेल. भारतीय संघ आपला दुसरा सामना ३ सप्टेंबर रोजी हाँगकाँगविरुद्ध खेळेल. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होईल. भारतीय संघ ‘अ’ गटात आहे. या गटात भारत, पाकिस्तान, थायलंड आणि हाँगकाँग या देशांचे संघ आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आगामी सामन्याकडे सर्वांचे लक्ष आहे. हा सामना शनिवार, ५ सप्टेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८:०० वाजता सुरू होईल. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.






