अंजु वर्मा भारतात परतणार : फेसबुकवर बोलता बोलता मैत्री आणि त्यानंतर प्रेम इतकं सगळं करून थेट भारताची बॉर्डर पार करून प्रेमासाठी अंजु वर्मा पाकिस्तानात पोहोचली. अंजु वर्मा हिने पाकिस्तानात तिच्या प्रियकरासोबत लग्न केलं परंतु आता तिला पुन्हा भारतामध्ये यायचे आहे. अंजु वर्मा हिने लग्न करून फातिमा असे नाव ठेवले. महत्वाचं म्हणजे पाकिस्तानमधून आलेली सीमा हैदर हिना भारत सोडायचा नाहीये. अंजु वर्मा हिला भारतामध्ये का यायचं आहे? कशासाठी यायचं आहे असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. महत्वाचं म्हणजेच तीला तिचे कुटूंबीय स्वीकारणार का? हा खरा प्रश्न. अंजू मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आणि ती आपल्या मुलांना खूप मिस करतेय त्यामुळे तिच्या आरोग्याचा विचार केला तर तिने भारतात परत जाणंच योग्य राहिल असं नसरुल्लाहने म्हटलंय.
फेसबुक फ्रेन्डच्या प्रेमात वेडी होऊन ने पाकिस्तान गाठलं. तिथे जाऊन मित्राशीच नवा संसार थाटला. जिच्यासाठी पाकिस्तानने रेड कार्पेट टाकलं अशी अंजू वर्मा उर्फ फातिमा आता पुन्हा भारतात येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. जुलैमध्ये आपल्या फेसबुक फ्रेन्डला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या अंजूला आता भारताची आठवण येत आहे. अंजूला तिच्या दोन मुलांची आठवण येत असल्याचा दावा अंजूचा पाकिस्तानातील पती नसरुल्लाहने केला आहे. अंजूला जरी भारतात यायचं असलं तरी तिचा पती आणि मुलं तिला स्विकारणार का? हा खरा प्रश्न आहे.आमच्यासाठी तू केव्हाच मेलीस असं म्हणत तिच्या पतीने तिच्यासोबतचे सर्व संबंध काहीच दिवसांपूर्वी तोडले होते.त्यामुळे भारतात येऊ इच्छिणाऱ्या अंजूसमोर मोठं कोडं आहे.
भारतात परतणार असं म्हणणाऱ्या अंजूची भाषा मात्र २४ तासाच बदलली आणि अंजूने थेट मित्रासोबतच लग्नगाठ बांधली. त्याआधी धर्मांतर केलं प्री वेडिंग फोटोशूट केलं आणि पाकिस्तानची सून झालेल्या अंजूला आहेरांचा वर्षाव होऊ लागला. कुणी फ्लॅट गिफ्ट केला, तर कुणी धनादेश दिला. वाटलं होतं अंजूचा संसार छान सुरु असेल ती तिथे रमली असेल पण तसं झालं नाही. आता तिला पुन्हा भारतात जाण्याचे वेध लागले. दुसरीकडे सीमा हैदर मात्र भारतात खूपच रमली आहे.