
India-Pakistan Dispute
हे देखील वाचा : US Politics : ट्रम्प यांच्याच पक्षातील खासदार फुटले? सिनेटमध्ये इराण युद्धविरोधी ठराव मंजूर
पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी असीम लिफ्तिकार यांचनी बैठकीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर भारताने तातडीने उत्तर देते पाकिस्तानन बैठकीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. भारताचे प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि राहतील हेही त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच त्यांनी काश्मीरचा मुद्दा हा भारत-पाकिस्तानचा अंतर्गत वाद असून यामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप स्वीकारले जाणार नाही असेही स्पष्ट केले.
प्रतिनिधी हरीश यांनी म्हटले की, सह-अध्यक्षाच्या भूमिकेत दोन्ही प्रतिनिधींकडून संतुलित आणि निष्पक्ष भूमिका असली पाहिजे. मात्र, पाकिस्तान UNSC सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर राजकीय हेतूने करत आहे. त्यांनी नमूद केले की, त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या तरतुदींमधील अध्याय चौथा आणि पाचवाचा उल्लेख करत सुरक्षा परिषदेच्या जबाबादऱ्या अधोरेखित केल्या.
त्यांनी सांगतिले की, सुरक्षा राष्ट्र परिषदेच्या तरतुदींनुसार, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास त्यावर कठोर उपाययोजना झाल्या पाहिजेत. तसेच अंतर्गत वाद हे शांततामय मार्गाने सोडवले गेले पाहिजेत.
तसेच एरिया-फॉर्म्युला बैठका अनौपचारिक आणि गोपनीय असतात. या परिषदांमध्ये सदस्य आणि निमंत्रित प्रतनिधी आपले मते मांडू शकता. परंतु पाकिस्तानने या परिषदेत भारतासोबतचा अंतर्गत मुद्दा उपस्थित केल्याने प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काश्मीर मुद्द्यावरुन पुन्हा दोन्ही देशांमध्ये मतभेद निर्माण झाले असून भारताने आपली भूमिका ठामपणे मांडली आहे.
हे देखील वाचा : US Visa Revocation : अमेरिकेने भारतीय विद्यार्थ्याला हाकललं? कोणत्याही कारणाशिवाय F-1 Visa रद्द