India Russia Relations : पुतिनने मोदींच्या पाठीत खुपसला खंजीर? युद्धजन्यपरिस्थितीत पाकिस्तानला मदत तर भारताला आठकाडी (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
Iran-Israel War : रशियाला युद्धातून ‘असा’ही होतोय फायदा; युद्धातून अब्जावधीचा झाला नफा
भारत देशाच्या एकूण गरजेपैकी जवळपास ४०% कच्चा तेलाची आयात ही आखीत देशांमधून स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्गे करतो. इराणने
या मार्गावरुन भारताच्या काही जहाजांना जाऊ दिले आहे, परंतु परिस्थितीच्या मनाने जहाजांचा आवाका खूप कमी आहे. यामुळे संकट काळात भारताने आपल्या मित्राकडे रशिया(Russia) कडे धाव घेतली होती. परंतु रशियाने भारताला तेल स्वस्त दरात देण्यास नकार दिला असून किमतीत मोठी वाढ केली आहे.
पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, दुसरीकडे रशियाने पाकिस्तान(Pakistan) ला स्वस्त दरात तेल उपलब्ध करून दिल्याचे संकेत मिळाले आहे. यामुळे भारतीय तज्ज्ञांनी रशियाच्या या बदलत्या भूमिकेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
रशियाने तेलाच्या झटक्यानंतर भारताला आणखी एक मोठा हादरा दिला आहे. रशियाने देशांतर्गत मागणीला प्राधान्य देत Ammonium Nitrate आणि इतर काही खतांची निर्यात २१ एप्रिल २०२६ पर्यंत थांबवली आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात खत आयात करतो. २०२५ मध्ये सुमारे २५ लाख टन खत भारताने एकट्या रशियाकडून खरेदी केले होते. परंतु हंगामाच्या तोंडावर रशियाने खत पुरवठा थांबवल्यामुळे भारताच्या शेतीला मोठा धक्का बसला आहे.
सध्या भारतासमोर दुहेरी संकट उभे ठोकले आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद असल्याने सौदी आणि ओमानसारख्या आखाती देशांतून होणारी आयात ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे रशियाने खत पुरवठा थांबवला आहे. यामुळे भारताच्या अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होण्याची आणि महागाई वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. सध्या भारताकडे पर्यायी मार्ग म्हणून बेलारुस आणि मध्य आशियाईतील देश आहे. पण सगळ्यात विश्वासू मित्राने संकटकाळात पाठ फिरवल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Iran War Impcat : मध्यपूर्वेतील संघर्षाचा फिलिपिन्सला मोठा तडाखा; देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर
Ans: रशियाने मध्यपूर्वेतील इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेल पुरवठा साखळीत तुटवडा निर्माण झाल्याने आपल्या धोरणात बदल केला आहे. यामध्ये भारताला दिल्या जाणाऱ्या सवलती कमी केल्या आहेत.
Ans: रशियाकडून हंगामाच्या काळात खतांचा पुरवठा थांबल्याने भारतीय शेती धोक्यात येऊ शकते. यामुळे अन्नधान्याचा उत्पादनात तुटवडा निर्माण होऊन महागाई वाढण्याची शक्यता आहे.






