
Strait of Hormuz: भारताच्या 'त्या' जहाजांचा विषय काय? Iran ने फेटाळला दावा; होर्मुझमध्ये झाला गेम?
इराण- इस्त्रायल युद्धाचा आज 13 वा दिवस
इराणने भारताला दिलेल्या परवानगीचे केले खंडन
इराणने होर्मुझ सामुद्रधुनी भारतासाठी खुली केल्याचे आलेले समोर
Strait of Hormuz: इराण विरुद्ध इस्त्रायल अन् अमेरिका यांच्यातील युद्धाचा आज 13 वा दिवस आहे. या युद्धामुळे वैश्विक संकट निर्माण झाले आहे. भारतात व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने अनेक हॉटेल्स, मेस बंद होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान इराणने भारताच्या ‘पुष्पक’ आणि ‘परिमल’ या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीमधून जाण्याची परवानगी दिल्याचे समोर आले होते. मात्र इराणने या समोर आलेल्या बातम्यांचे खंडन केले आहे.
सध्या इराण युद्धामुळे अनेक देश ऊर्जा संकटात सापडले आहेत. दरम्यान तेहरानने भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिल्याचे समोर आले होते. मात्र हे वृत्त इराणने फेटाळून लावले आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इराणचे नेते अब्बास अरघची यांच्यातील चर्चेनंतर इराणने भारताला सवलत दिल्याचे समोर आले होते. मात्र इराणने याचे खंडन केले आहे. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीसाठी होर्मुझ सामुद्रधुनी महत्वाचा भाग असून तो सागरी मार्ग सुरू ठेवण्याच्या दृष्टीने ही चर्चा झाली असल्याचे वृत्त समोर येत नाही.
Global Oil Crisis : भारताला दिलासा, पण अनेक देश अजूनही तेल संकटात; जाणून घ्या इस्रायल-अमेरिकेचे हाल
एका वृत्तसंस्थेनुसार, तेहरानमधील एका सूत्राने हे वृत्त फेटाळून लावले असून, हे अजिबात खरे नसल्याचे म्हटले आहे. भारताला विशेष परवानगी मिळाल्याच्या बातम्यानंतर हे विधान समोर आले आहे. दरम्यान, या आधी एका वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार, पुष्पक आणि परिमल हे दोन भारतीय टॅंकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करत आहेत. मात्र अमेरिका, युरोप, इस्त्रायलच्या जहाजांना या सागरी मार्गावर अनेक निर्बंधांचा सामना करावा लागत आहे.
अनेक देश अजूनही तेल संकटात
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी मंगळवारी (१० मार्च २०२६) इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी दीर्घ चर्चा केली. या चर्चेत मध्यपूर्वेतील परिस्थितीवर सतत संपर्कात राहण्याचे मान्य करण्यात आले होते. या वेळी भारताने आपल्या व्यापारी हितसंबंधाच्या आणि उर्जा सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. या चर्चेनंतर इराणने भारताच्या भूमिकेचा आदर करत, भारतीय झेंड असलेल्या जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली. इराणने दिलेल्या परवानगीमुळे ‘पुष्पक’ आणि ‘परिमल’ हे दोन भारतीय टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करत आहेत. हा भारताचा मोठा कूटनीतीक विजय मानला जात आहे.