Global Oil Crisis : भारताला दिलासा, पण अनेक देश अजूनही तेल संकटात; जाणून घ्या इस्रायल-अमेरिकेचे हाल
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी मंगळवारी (१० मार्च २०२६) इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी दीर्घ चर्चा केली. या चर्चेत मध्यपूर्वेतील परिस्थितीवर सतत संपर्कात राहण्याचे मान्य करण्यात आले होते. या वेळी भारताने आपल्या व्यापारी हितसंबंधाच्या आणि उर्जा सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. या चर्चेनंतर इराणने भारताच्या भूमिकेचा आदर करत, भारतीय झेंड असलेल्या जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली.
इराणने दिलेल्या परवानगीमुळे ‘पुष्पक’ आणि ‘परिमल’ हे दोन भारतीय टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करत आहेत. हा भारताचा मोठा कूटनीतीक विजय मानला जात आहे. शिवाय भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने पर्यायी पुरवठा साखळी इतर देशांच्या तुलनेत मजबूत आहे. परंतु जागतिक तुटवडा पाहता भविष्यता तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यात आहेच.






