
Marco Rubio India Visit
इराणशी तणावादरम्यान रुबियो यांचा हा दौरा होत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी भारताला भेट दिले होती. या दौऱ्यानंतर रुबिया यांचा दौरा होत असल्याने अमेरिका इराण युद्धात भारत मध्यस्थी करत आहे का? असा प्रश्न उपस्थि केला जात आहे.
परंतु तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, क्वाडचे देश चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी एकत्र येत आहे. या परिषदेत ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका (America)आणि भारत या देशांचा समावेश आहे. अमेरिका-इराण वाद (US Iran Conflict) आणि युक्रेन युद्धावरुन या देशांमध्ये मतभेद असले तरी, चीनला रोखण्यासाठी हा दौरा होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हिंद-प्रशांत महासागरात चीन(China)च्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्याचा या बैठकीचा उद्देश आहे. तसेच जुलै २०२५ नध्ये सुरु करण्यात आलेल्या क्वॉड क्रिटिकल मिनर्लस एनिशिएटिव्ह या मोहिमेला गती देण्यावरही या परिषदेत चर्चा होऊ शकते.
सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी लागणाऱ्या ग्रेफाइटसाठी अनेक देशांना चीनवर अवलंबून रहावे लागते. परंतु ही मक्तेदारी मोडून काढण्यावर आणि पुरवठा साखळी सुरक्षित करण्यावर चर्चा होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुबिया यांच्या दौऱ्यात भारताच्या वरिष्ठ नेत्यांसोबत उच्चस्तीरय बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे. भारत-अमेरिकेतील संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यावरही चर्चा केली जाणार आहे. तसेचे दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यापार सहाकार्यावरही चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
भारत, अमेरिका, जपान (Japan) आणि ऑस्ट्रेलिया या लोकशाही देशांचा एक धोरणात्मक गट म्हणजे क्वॉड समिती आहे. ही समिती जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी मांडली होती. मात्र, चीनने या समितीवर सतत टीका केली आहे. ही समिती चीनला घेरण्यासाठी बनवण्यात आली असल्याचा आरोप चीनने केला आहे.
Ans: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो २३ ते २६ मे दरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत.
Ans: या दौऱ्याचा उद्देश नवी दिल्लीत होणाऱ्या क्वॉड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणे आहे. तसेच भारत आणि अमेरिकेतील उर्जा सुरक्षा, संरक्षण सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार यांसारख्या विषयांवर चर्चा करणे आहे.
Ans: सध्या मध्यपूर्वेत अमेरिका इराण तणाव वाढला असून याचा थेट परिणाम जागतिक उर्जा पुरवठेवर होत आहे. होर्मुझची खाडी बंद असल्याने तेल पुरवठा विस्कळीत झाला असून इंधन दर गगनाला भिडले आहेत. तसेच चीनची वाढती मक्तेदारी रोखण्यासाठी देखील ही समिट महत्त्वाची मानली जात आहे.