चीनमधे भीषण दुर्घटना; रेस्टॉरंटमधील आगीत 22 जणांचा होरपळून मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बिजिंग: चीनमध्ये एख भीषण दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या उत्तरेकडील लिओयांग शहरात एका रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागील. या आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये खिडक्या दरवाज्यांमधून आगीच्या ज्वाला बाहेर पडताना दिसत आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आग विझवण्याचे कार्य सुरु आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार, दुपारी 12:25 वाजता ही दुर्घटना घडली. या घटनेत 3 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.
22 dead and 3 injured after a fire broke out at a restaurant near a resettlement housing complex in Liaoyang, China
Investigation is ongoing pic.twitter.com/DWEMKZG8RD
— RT (@RT_com) April 29, 2025
चीनमध्ये औद्योगिक अपघात अशा घटना वारंवार घडत असतात. अलीकड अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुरक्षेकडे दुर्लक्ष आणि प्रशिक्षणाचा अभावामुळे अशा घटना सतत घडत असतात. यागील काही कारणे म्हणजे, पायाभूत सुविधा नसणे, तसेच काम करताना दुर्लक्ष, बेकायदेसीपणे साठवलेले रसायने आणि अग्निशामक उपकरणांचा अभावामुळे अशा घटनांची कारणे ठरतात.
या महिन्यात चीनमध्ये आगीची ही दुसरी मोठी घटना आहे. यापूर्वी 9 एप्रिल रोजी उत्तर चीनमधील हेबेई प्रांतातील लोंगहुआ काऊंटीमधील एका नर्सिंग होममध्ये आग लागील होती. या आगीत 20 वृद्धांचा मृत्यू झाला होता. आगी लागली त्यावेळी नर्सिंग होममध्ये एकूण 39 वृद्ध उपस्थित होते. यापूर्वी 2025 च्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात देखील अशीच एक घटना घडली होती. चीनच्या उत्तरेकडील हेबेई प्रांतातील झांगजियाकौ शहरातील एका बाजारपेठेत लागलेल्या भीषण आग लागली होती. यामध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
लियाओयांग हे शहर लियाओनिंग प्रांतात आहे. हे शहर चीनच्या गंजलेल्या पट्ट्याचा भाग आहे. यापूर्वी हे शहर एक औद्योगिक शहर म्हणून ओळखले जायचे. पण गेल्या काही काळात मोठ्या संख्येने लोक स्थलांतरित झाले आहेत.
सातत्याने होणाऱ्या या घटनांमुळे चीनमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. आगीची घटना असो वा अपघात, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेची योग्य काळजी घेतली जावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.