Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताने पराभव स्वीकारावा…! पुन्हा पाकिस्तानच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याने केली आगपाखड

India Pakistan Relations : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण कायम आहे. पाकिस्तान सतत भारतविरोधी विधान करत आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानच्या अधिकाऱ्याने भारताचा युद्धा पराभव झाला असल्याचे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 20, 2025 | 07:47 PM
Pakistan won war against India say Ishaq dar

Pakistan won war against India say Ishaq dar

Follow Us
Close
Follow Us:

Pakistan Threatens India : इस्लामाबाद : भारताने पाकिस्तानला (Pakistan) ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) मोहिम राबवत आणि नंतर चांगला धडा शिकवला आहे. पण पाकिस्तान मात्र काही सुधारण्याचे नाव घेईना. पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याने भारताला पोकळ धमकी दिली आहे. भारतसोबतच्या युद्धात पाकिस्तानचाच विजय झाल्याचा भ्रम पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी बाळगला आहे. संपूर्ण जगभरच एकच गरळ ओकत ते फिरत आहेत. असीम मुनीर, बिलावल भूट्टो, पंतप्रधान शाहबाज यांच्यानंतर आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी भारताविरोधी विधान केले आहे.

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

भारताने पराभव स्वीकारावा…! 

इशाक दार यांनी पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताचा प्रदेश सुरक्षा पुरवठादाराचा भ्रम मोडला असल्याचे म्हटले आहे. भारत पाकिस्तान युद्धात त्यांचाच विजय झाला असून भारताने पराभव स्वीकारावा असे इशाक दार यांनी म्हटले आहे. सध्या ते लंडनच्या अधिकृत दौऱ्यावर असून लंडनमध्ये पत्रकार परिषदेते बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

परराष्ट्र मंत्री ब्रिटनच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. यावेळी लंडनच्या एक पक्षकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटले की, “भारतासोबतच्या लष्करी संघर्षात पाकिस्तान विजयी झाला आहे.” त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी भारतामुळेच युद्ध सुरु झाले होते आणि त्यांचा पराभव झाला असून त्यांनी तो स्वीकारावा असे म्हटले आहे. इशाक दार यांनी दावा केला आहे की, भारतीय माध्यमांनी हे मान्य केले आहे. तर पाकिस्तान तथ्यांवर आणि सत्यावर आधिरातच हा दावा करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय आहे सत्य?

२२ एप्रिल २०२५ मध्ये जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला होता. यामध्ये २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केली होती. भारताने यानंतरच्या पाकिस्तानच्या हल्ल्यांनाही चोख प्रत्युत्तर दिले होते.

पाकिस्तानला मोठा पराभव पत्कारावा लागला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी उघडपणे हे स्वाकारही केले होते. परंतु तरीही पाकिस्तान सुधारलेला नसून भारताच्या विजयाला नाकारत आहे. भारताने संपूर्ण जगासोमर पुरावे सादर करुनही पाकिस्तान पराभव मान्य करण्यास तयार नाही. पाकिस्तानचे अधिकारी भारताला एकमागून एक धमकी देतच आहेत.

इशाक दार यांनी पुन्हा जुने गाऱ्हाने गात बढाई मारली आहे. पाकिस्तान नेहमीच दहशतवादविरोध उभा राहिला आहे. तसेच सर्व देशांच्या सन्मान, प्रतिष्ठा, सार्वभौवत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी उभा राहिला आहे. यामुळे इतरांकडूनही हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे अधिकारी उघडपणे खोटे बोलत असून त्यांचा पुन्हा एकदा अपमान झाला आहे.

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन

Web Title: Pakistan won war against india say ishaq dar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack
  • Pakistan News

संबंधित बातम्या

‘भारत हिंमत करणार नाही…’ ; Operation Sinddor 2.0 वर दहशतवादी हाफिज सईदची पोकळ धमकी, VIDEO
1

‘भारत हिंमत करणार नाही…’ ; Operation Sinddor 2.0 वर दहशतवादी हाफिज सईदची पोकळ धमकी, VIDEO

गुपचूप पार पडले असीम मुनीरच्या कन्येचे लग्न; पुतण्याच बनला जावई; जाणून घ्या कोण आहे अब्दुल रहमान?
2

गुपचूप पार पडले असीम मुनीरच्या कन्येचे लग्न; पुतण्याच बनला जावई; जाणून घ्या कोण आहे अब्दुल रहमान?

ट्रम्पनंतर चीन बनला पाकिस्तानचा पाठीराखा; भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा केला दावा, सत्य काय?
3

ट्रम्पनंतर चीन बनला पाकिस्तानचा पाठीराखा; भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा केला दावा, सत्य काय?

पाकिस्तानची मान तुकवली! Operation Sindoor मध्ये मोठे नुकसान; मंत्री इशाक दार यांची मोठी कबुली
4

पाकिस्तानची मान तुकवली! Operation Sindoor मध्ये मोठे नुकसान; मंत्री इशाक दार यांची मोठी कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.