
venezuela earthquake impact on india oil supply
इराण युद्धामुळे देशाला आधीच तेल पुरवठ्यातील व्यत्ययाचा सामना करावा लागत होता. दरम्यान, व्हेनेझुएला अलीकडेच भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कच्च्या तेलाचा एक महत्त्वाचा स्त्रोत म्हणून उदयास आला आहे. त्यामुळे, त्याच्या निर्यात पायाभूत सुविधांमध्ये कोणताही व्यत्यय आल्यास त्याचे परिणाम देशाच्या सीमांच्या पलीकडेही दूरवर पोहोचू शकतात.
Venezuela Earthquake :व्हेनेझुएलात मृत्यूचं तांडव! मृतांचा आकडा २०० पार; हजारो कुटुंब बेघर
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मते, एप्रिल आणि मे २०२६ मध्ये व्हेनेझुएला भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या देशांपैकी एक म्हणून उदयास आला. आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील सरासरी मासिक आयात अंदाजे ६४,००० मेट्रिक टनांवरून एप्रिल-मे २०२६-२७ दरम्यान १० लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त झाली. यामुळे हा भूकंप (Earthquake) केवळ एक स्थानिक आपत्ती नाही.
धोका केवळ तेल सुविधांच्या भौतिक नुकसानीपुरता मर्यादित नाही. जरी निर्यात टर्मिनल मोठ्या संरचनात्मक नुकसानीतून वाचले, तरी त्यामुळे होणाऱ्या व्यत्ययांचा जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक व्यवस्थेत अडथळा आणि बंदरांवरील आपत्कालीन निर्बंधांमुळे मालवाहतुकीचा वेग काही दिवस किंवा आठवडे मंदाव शकतो.
याचे परिणाम केवळ सध्या समुद्रात असलेल्या मालवाहू जहाजापुरते मर्यादित नाहीत. ओएनजीसी विदेशच्या माध्यमातून भारताची व्हेनेझुएलामध्ये थेट गुंतवणूक आहे. तेथील तेल प्रकल्पांमध्ये या कंपनीची हिस्सेदारी आहे. कोणताही दीर्घकाळ चाललेला व्यत्यय भारताच्या कार्यात्मक आणि आर्थिक हितसंबंधावर परिणाम करू शकतो.
विशेष म्हणजे, इतर अस्थिर ऊर्जा स्रोतांवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने व्हेनेझुएलाकडे मोर्चा वळवला होता. तथापि, भूकंपाने हे दाखवून दिले आहे की प्रत्येक नवीन व्यापारी मार्गासोबत स्वतःची आव्हाने आणि धोके येतात.
या महिन्याच्या सुरुवातीला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्याशी खाणकाम, अत्यावश्यक खनिजे, औषधनिर्माण आणि ऑटोमोबाईल यांसारख्या क्षेत्रांमध्ये भारतीय कंपन्यांच्या गुंतवणुकीच्या शक्यतेवर चर्चा केली होती.