AVAS प्रणाली आता इलेक्ट्रिक वाहनांना अनिवार्य (Photo Credit - AI)
AVAS System for Electric Vehicles: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) एक महत्त्वाचा मसुदा जाहीर केला आहे. यानुसार, ऑक्टोबर २०२७ पासून भारतातील सर्व इलेक्ट्रिक कार, बस आणि ट्रकसाठी Acoustic Vehicle Alerting System (AVAS) बसवणे बंधनकारक असणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या शांतपणामुळे निर्माण होणाऱ्या अपघातांची शक्यता कमी करणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
मंत्रालयाच्या घोषणेनुसार, ऑक्टोबर २०२६ नंतर तयार होणाऱ्या सर्व नवीन इलेक्ट्रिक प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांमध्ये ही AVAS सिस्टीम अनिवार्य असेल. तर, ऑक्टोबर २०२७ पासून तयार होणाऱ्या सध्याच्या (Existing) मॉडेल्समध्येही हा सुरक्षा उपाय असणे आवश्यक आहे.
🚨 BIG SAFETY MOVE! 🚗⚡️ From Oct 2027, all electric cars, buses & trucks in India must have a Sound Alert System (AVAS) 🔊 👉 This feature emits an artificial sound so pedestrians & road users can detect silent EVs.
👉 New EV models will need it from Oct 2026. A step towards… pic.twitter.com/RVdxit1y7p — Infra Talks (@InfraTalksYT) September 29, 2025
मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, “ऑक्टोबर १, २०२६ नंतर तयार होणाऱ्या नवीन मॉडेल्समध्ये आणि ऑक्टोबर १, २०२७ नंतर तयार होणाऱ्या जुन्या मॉडेल्समध्ये, M आणि N कॅटेगरीच्या इलेक्ट्रिक वाहनांना AVAS सिस्टीम बसवणे आवश्यक आहे, जी AIS-173 (सुधारित) मानकांनुसार असेल.” M कॅटेगरी प्रवासी वाहनांसाठी असून, N कॅटेगरी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी आहे.
AVAS तंत्रज्ञानामुळे वाहन २० किमी प्रतितास (kmph) वेगापेक्षा कमी असताना आपोआप आवाज निर्माण करेल. ‘सायलेंट’ असलेल्या इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरेल, कारण त्यामुळे पादचारी, सायकलस्वार आणि इतर रस्ते वापरकर्त्यांना वाहनांच्या जवळ येण्याबद्दल सतर्कता मिळेल. विशेषतः कमी वेगात, जेव्हा इंजिनचा आवाज येत नाही, तेव्हा हे फीचर खूप महत्त्वाचे ठरते. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जास्त वेगामध्ये टायरच्या घर्षणातून पुरेसा आवाज निर्माण होतो, त्यामुळे AVAS ची गरज फक्त कमी वेगातच असेल.
Mahindra ची ‘ही’ कार आहे खास! म्हणूनच तर फक्त 999 ग्राहकांना मिळणार डिलिव्हरी
याच घोषणेमध्ये सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता, ट्यूबलेस टायर असलेल्या कार, तीन-चाकी आणि क्वाड्रिसायकल वाहनांमध्ये सुटा (स्पेयर) टायर ठेवणे अनिवार्य नाही.
सरकारचा हा निर्णय इलेक्ट्रिक वाहनांना अधिक सुरक्षित बनवण्यासाठी आणि रस्त्यावर सर्व वापरकर्त्यांसाठी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. भविष्यात ईव्ही वाहनांचा प्रसार जसजसा वाढेल, तसतसे AVAS सारखे तंत्रज्ञान रस्ते सुरक्षेचा एक अविभाज्य भाग बनेल.