• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • Respect The Karanja

करंज्यांना भलताच मान

  • By Amrut Sutar
Updated On: Sep 24, 2023 | 06:00 AM
करंज्यांना भलताच मान
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दिवाळीच्या फराळांची यादी नजरेसमोर आणली तर त्यातील कोणता पदार्थ चाखायला मजा येईल यासाठी एक नजर पुरेशी असते. चकली, बेसनाचा लाडू, रवा लाडू, चिवडा, अनारसे असे असंख्य पदार्थ नजरेसमोर येतात. सरतेशेवटी फराळाच्या डीशमध्ये एक पदार्थ हमखास असतो, आणि तो म्हणजे चकली. दिवाळीच्या फराळात हा पदार्थ दुर्लक्षित रहात असला तरी कोकणात गणेशोत्सवाच्या काळात त्याला भलताच मान असतो. श्रावण संपत आला की, मुंबई-पुण्याच्या चाकरमान्यांना गणपतीचे वेध लागतात. गौरी-गणपती हा सण कोकणात दिवाळी इतकाच किंबहुना त्याही पेक्षा महत्वाचा सण मानला गेला आहे. कोकणात गणेशोत्सवाला फार मानाचे अन् महत्वाचे स्थान आहे. गणेशोत्सव हा कोकणचा मुख्य सण. हिंदू परिवार एकत्र कुटुंब पध्दतीकडून विभक्त कुटुंब पध्दतीकडे वेगाने वाटचाल करीत असताना गणेशचतुर्थी हा सण त्यांना काही दिवसाकरिता का होईना एकत्र आणण्याचे काम करतो. अशा या सणात बायकांची पाककला बहरते. त्यावेळी करंज्यानी भरलेले ताट त्यांच्यासमोर येते. कोकणात पिठ्याच्या किंवा साखरेचे सारण असलेल्या करंज्या केल्या जातात. मालवणी मुलखात दिवाळीत एकवेळ करंज्या मिळणार नाहीत; मात्र गणेशोत्सवात प्रत्येक घरा-घरात त्या आपल्याला मिळतील.

दिवाळीच्या फराळातली करंजी कुणालाच नको असते. कारण एकतर होडीसारखा आकार आणि अनेकदा आकार मोठा नि सारण कमी असा प्रकार. त्यामुळे भल्याभल्यांच्या घरची करंजी म्हणजे चक्क खुळखुळा असतो… अन् तरीही बनवणारी सुगरण- हौशी असेल, तर करंजीसारखा चवदार आणि खुसखुशीत पदार्थ नाही. महाराष्ट्रात सर्वत्र करंज्या करायची पध्दत सारखीच आहे. फक्त क्वचित कुठे तिला कडबू (सीमाभागात), गजेर्लं (मराठवाड्यात) अशी वेगळी नावं आहेत. पण पध्दत एकजात सारखी. आधी मैदा घ्यायचा, तो घट्ट मळायचा. मग आतल्या सारणासाठी बारीक रवा, सुकं खोबरं (किसून) भाजून घेऊन, नंतर त्यात पिठी साखर टाकायची. या सारणात सुका मेवाही टाकला जातो. सारण शक्यतो आधीच करुन घेतात. पारीसाठी मैदा मळून त्याच्या छोट्या छोट्या पु-या केल्या जातात. या पुऱ्यांत मध्यभागी सारण भरुन त्या बंद केल्या जातात. नंतर कातणीने होडीसारखा किंवा अर्धचंदाकृती आकार देऊन त्या तेलात किंवा डालड्यात तळल्या जातात.

पध्दत वरवर एकदम सोपी वाटते. पण करंज्या जर खुसखुशीत व्हायला हव्या असतील, तर करंज्यांसाठी मळलेला मैद्याचा गोळा तास-दीड तास पाट्‌यावर कुटावा लागतो. या कुटण्यामुळे मैद्याची लवचीकता आणखी वाढते आणि करंजी खाताना जिभेवर ठेवल्या ठेवल्या विरघळते. करंजी बनवण्याची पध्दत संपूर्ण महाराष्ट्रात अशीच आहे. पण काही ठिकाणी त्यात सारणाचा मात्र फरक केला जातो. उदाहरणार्थ विदर्भात पिठीची करंजी, गूळ-तिळाची करंजी आणि शेंगदाण्याची करंजी असे तीन प्रकार असतात. पैकी पिठीची करंजी  ही रवा आणि पिठी साखरेच्या सारणापासूनच केली जाते. पण गूळ-तिळाच्या करंजीत सारण म्हणून काळे तीळ आणि गुळाचं मिश्रण भरतात. त्यासाठी तीळ खरपूस भाजून घेऊन त्यात सुका गूळ बारीक चिरुन टाकतात. करंजीतलं तीळ-गुळाचं हे मिश्रण करंजी तळल्यावर भलतंच खमंग लागतं. याचप्रमाणे शेंगदाणे भाजून त्याची भरड करुन, त्यात गूळ कालवून केलेलं सारण भरलं की, शेंगदाण्याची करंजी तयार होते.

कातणीने कातण्याऐवजी पारी बंद करुन तिला मुरड घातली की ‘मुरडीची करंजी’ तयार होते. करंज्या, मोदक, चिरोटे पूर्वापार चालत आलेले आहेत. शुक्रधातुपोषक आणि वात-पित्तशामक करंज्या मनाला तृप्त करतात. अनेकदा तिला ‘चंद्रकला’, ‘लवंगलतिका’ अशा नाजुक नावांने करंजीला संबोधलं जातं. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि वेगवेगळ्या सणांना कानवले बनवले जातात. खानदेशात नागपंचमीला गव्हाच्या कणकेत हळद-मीठ टाकून त्याची पोळी लाटून कानवले बनवले जातात. मराठवाड्यात, गव्हाच्या पोळीत बारीक चिरलेला गूळ आणि कुटलेली बडीशेप टाकून ती दुमडून तिला मुरड घालून कानोला तयार केला जातो. हा कानवला तव्यावर हलक्या हाताने शेकवला जातो. शेकवल्यावर तो पोळीसारखाच टम्म फुगतो आणि आत विरघळलेला गूळ सर्वत्र पसरतो. सासुरवाशीण झालेल्या मुलीला सणाला माघारी जायचे, असेल तर मराठवाड्यात हे कानवले केले जातात.

सीकेपींचं कानवले वेगळेच असतात आणि ते दिवाळीत हमखास केले जातात. सीकेपींच्या या कानवल्यासाठी आधी सारण तयार करुन घेतात. हे सारण म्हणजे तांबुस रंगावर भाजलेला खोबऱ्याचा किस, भाजलेली खसखस, थोडंसं भाजलेलं गव्हाचं पीठ, पिठी साखर आणि वेलची यांचं खमंग मिश्रण असतं. तर कानवल्यांच्या बाहेरच्या पारीसाठी बारीक रवा घेऊन तो दूध-पाण्यात घट्ट भिजवायचा. चवीला मीठ टाकायचं. दीडेक तास भिजल्यावर रवा चांगला फुलतो. नंतर हा रवा पाट्यावर कुटून त्याचा गोळा करायचा.हा गोळा मळून ठेवल्यावर धुतलेल्या तांदळाची बारीक पिठी घेऊन ती तेवढ्याच तुपात चांगली एकजीव होईपर्यंत फेटायची. याला साटं असं म्हणतात. हे तयार झालं की, रव्याच्या मळलेल्या गोळ्याच्या नेहमीच्या पोळ्यांसारख्या पोळ्या करायच्या. नंतर एक पोळी घेऊन तिला हातानेच सर्वत्र साटा लावायचा. नंतर त्यावर दुसरी पोळी ठेवायची. तिलाही साटा लावायचा, मग त्यावर तिसरी पोळी ठेवायची. सीकेपी असं पाच ते सात पोळ्या एकावर एक ठेवतात. नंतर त्याची हलक्या हाताने गुंडाळी करायची आणि तिच्या पापडासारख्या लाट्या करायच्या. लाट्या झाल्या की एकेक लाटी घेऊन ती लाटायची. नंतर त्यात आधी तयार करुन ठेवलेलं सारण भरुन पारी घट्ट बंद करायची. मग कातणीने कातून होडीसारखा आकार द्यायचा. हे कानवले तेलात किंवा डालड्यात तळताना मात्र काळजी घ्यावी लागते.सीकेपींप्रमाणेच मुंबईतल्या पाठारे प्रभू समाजाचंही एक वेगळेपण आहे. या समाजात करंज्या तळण्याऐवजी त्या बेक केल्या जातात आणि या करंज्या पूर्णपणे सुक्या मेव्याच्या असतात.

पुरणाच्या करंज्या : साहित्य: २ वाट्या चणाडाळ २ वाट्या गूळ काजू, बदाम, पिस्ते यांचे बारीक केलेले तुकडे, वेलचीचूर्ण, तेल, मीठ, करंज्या तळण्यासाठी रिफाईंड तेल अथवा वनस्पती तूप (आपापल्या आवडीप्रमाणे)

कृती : चणाडाळ पुरणासाठी तशी मऊ शिजवावी;पाणी पूर्ण काढून गूळ घालून शिजवावी. गूळ घालतेवेळी जरा उशीरा सुक्यामेव्याचे तुकडे घालून आटवावी. पूरण थंड होऊ द्यावे. मैद्यामध्ये तुपाचे जास्त मोहन घालून, चवीपुरते मीठ घालून मैदा घट्ट मळावा. २ तासानंतर करंज्यांसाठी छोट्या पुर्‍या लाटून त्यात पुरण भरून करंज्यांना मुरड घालावी किंवा काताण्याने कातून मग त्या तळाव्या.

साखरेच्या करंज्या :- साहित्य- सुके खोबरे ६ वाट्या,  पिठीसाखर अर्धा किलो, मैदा पाऊण किलो (करंजीसाठी), खसखस १०० ग्रॅम, सफेद तीळ १०० ग्रॅम (भाजून घेणे), चारोळी, पिस्ता, बेदाणा, वेलची, रवा बारीक दीड वाटी.

कृती- खोबरे भाजून घ्यावे. रवा भाजून घ्यावा. खोबरे भाजतानाच त्यात खसखस घालावी. तीळ व इतर साहित्य घालावे व सर्व एकत्र करून साठा तयार करावा. नंतर मैद्यात जरा तेलाचे मोहन घालून मैदा घट्ट भिजवून ठेवावा. थोड्या वेळाने त्याची पाती लाटून वरील सारण भरून करंज्या तयार कराव्यात.

– सतीश पाटणकर, मुंबई
sypatankar@gmail.com 

Web Title: Respect the karanja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • article

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Feb 16, 2026 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.