
(फोटो सौजन्य:Chatgpt)
Delhi High Court on Telegram : सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आणि 21 जूनला सुरु होणाऱ्या नीट परिक्षांच्या पारर्श्वभूमीवर सरकार अँक्शन मोडवर आलं. या सगळ्यावर लोकप्रिय आणि बहुचर्चित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 22 जूनपर्यंत बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला होता. टेलिग्राम ॲपवरील तात्पुरत्या बंदीला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. टेलिग्रामसाठी दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने ती जाचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाने नेमका काय निर्णय घेतलाय जाणून घेऊयात.
परीक्षा सुरक्षित व्हावी आणि कॉपी-पेस्ट टाळता यावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. पण या सगळ्यावर टेलिग्राम ॲपवरील तात्पुरत्या बंदीवर याचिका दाखल केली होती. त्याचा उच्च न्यायालयाने शुक्रवारी (१९ जून, २०२६) रोजी निकाल दिला. न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय देत ही याचिक खारीज केली आहे.
याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, ‘सरकारचा निर्णय विसंगत मानला जाऊ शकत नाही. गेल्या महिन्यात, ३ मे रोजी नीट यूजी परीक्षा झाली होती, परंतु त्यानंतर पेपरफुटीचे प्रकरण समोर आले. यामुळे देशभरात संताप उसळला आणि राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. यानंतर सरकारने ३ मे रोजीची परीक्षा रद्द करण्यात आली’.
पुनर्परीक्षा २२ जून रोजी होणार असून, अशीच घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकार सर्व आवश्यक खबरदारी घेत आहे. यामुळे धोक्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने २२ जूनपर्यंत टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घातली आहे.
गुरुवारच्या सुनावणीदरम्यान, केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ॲपसंदर्भात विविध तांत्रिक मुद्दे उपस्थित केले. ज्यामुळे परीक्षांपूर्वी काही गैरप्रवृत्तीच्या व्यक्तींकडून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचं नमूद करण्यात आलं. पण न्यायालयाने सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचारले की, काही विद्यार्थ्यांच्या परीक्षांमुळे १५ कोटी वापरकर्त्यांना ॲप वापरण्यापासून कसे रोखले जाऊ शकते.
पावेल डुरोव्ह यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत लिहीलं होतं की, काही यूजर्सनी परीक्षेचे फुटलेले प्रश्न शेअर केल्यामुळे भारताच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने टेलिग्रामवर एका आठवड्यासाठी बंदी घातली. याचा फटका भारतातील 15 कोटींहून अधिक सामान्य टेलिग्राम यूजर्सना बसला आहे. परीक्षेचे साहित्य लीक करणाऱ्या लोकांना नाही. आणि या बंदीमुळे काहीही थांबलेले नाही. फक्त हे लीक्स इतर ॲप्सवर पसरले जातील.
NTA ने म्हटलं आहे की, या बंदीचा उद्देश संघटित कॉपी रॅकेट्स आणि परीक्षेसंबंधित खोट्या संदेशांच्या प्रसाराला आळा घालणे हा या बंदीचा उद्देश आहे. NTA चे डायरेक्टर जनरल अभिषेक सिंह यांनी म्हटलं आहे की, आम्ही कोणत्याही प्रकारची गडबड होऊ देणार नाही. परीक्षा कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण व्हावी यासाठी आम्ही नक्कीच योग्य पाऊलं उचलू.
OLA: ‘या’ राज्यात ओलाला लागला ‘ब्रेक’, परवानाच निलंबित; व्यवसाय थांबणार, अडचणी वाढणार! काय आहे कारण?