मेडिकल कॉलेजमध्ये 75 हजार जागा वाढवणार (फोटो- टीम नवराष्ट्र/istockphoto)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज मोदी सरकारच्या तिसऱ्या सत्रातील पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामण यांचा हा आठवा अर्थसंकल्प आहे. करात सूट, मध्यमवर्ग, महिला आणि शेतक्षेत्रावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. दरम्यान सर्वात जास्त लक्ष होतं ते शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या घोषणांकडे. शेतकऱ्यांना विनाक्रडीट कर्ज देणाऱ्या किसान क्रेडीट कार्डची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच आरोग्य क्षेत्रात देखील मोठी घोषणा करण्यात आले आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचे वाचन करत असताना वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षीपासून मेडिकल कॉलेजमध्ये 75 हजार जागा वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
अर्थसंकल्पाचे वाचन करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या, ‘विकासदर वाढवणे, खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे तसेच मध्यमवर्गीय वर्गाला ताकद देणे यावर सरकारचा भर असणार आहे. पुढील 5 वर्षांमध्ये विकासाच्या संधी निर्माण करणे, तसेच सरकारचे लक्ष हे आरोग्य आणि रोजगारावर असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यवस्थेला गती देण्याचे आमचे ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था बळकट होईल.’
हेही वाचा: Budget 2025: “… यावर केंद्र सरकारचा भर असणार”; अर्थमंत्री निर्मला सीतारमण
शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा
पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत १ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. डाळींसाठी ६ वर्षांची आत्मनिर्भरता योजना लागू. यात फळ आणि भाजी उत्पादकांवर विशेष लक्ष असणार आहे. योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यावर लक्ष देणार. उत्पादन वाढवणं आणि वितरण करणे यावर सुद्धा सरकारचे विशेष लक्ष असणार आहे. मखाण्याचे उत्पादन वाढवणार असे देखील अर्थमंत्रीनी सांगितले आहे. कापूस उत्पदनावर सुद्धा विशेष लक्ष देणार आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबतीत मोठी घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना एआय (AI) बाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. एआयच्या शिक्षणासाठी 500 कोटींची तरतूद केली जाणार आहे. ३ एआय एक्सलन्स सेंटर्स स्थापन करणार केले जाणार आहेत.
उत्पादनाला योग्य किंमत देऊन पुरवठा करणार
पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत १ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत देऊन पुरवठा करणार अशा महत्वाची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना लाख मोलाचं गिफ्ट
करात सूट, मध्यमवर्ग, महिला आणि शेतक्षेत्रावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. दरम्यान सर्वात जास्त लक्ष होतं ते शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या घोषणांकडे. शेतकऱ्यांन विनाक्रडीट कर्ज देणाऱ्या किसान क्रेडीट कार्डची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.