
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आपण महत्त्वाकांक्षी कल्पसर प्रकल्पाबद्दल बोलत आहोत. हा जगातील सर्वात मोठा किनारी गोड्या पाण्याचा जलाशय असेल, जो गुजरात सरकारद्वारे खंभातच्या आखातात बांधला जाणार आहे. हा प्रकल्प समुद्राच्या एका भागावर धरण बांधून, अंदाजे ७,८०० दशलक्ष घनमीटर (MCM) गोड्या पाण्याचा समुद्रात होणारा प्रवाह रोखेण्यासाठी बांधण्यात येणार आहे. यामुळे गुजरातच्या दुष्काळग्रस्त सौराष्ट्र प्रदेशाला पाणीपुरवठा होईल. तसेच देशभरातील अशा बऱ्याच दुष्काळी भागींची तहान भागवण्याचं महत्त्वाचं काम करेल.
खंभातच्या आखातात सुमारे ६० ते ६४ किलोमीटर लांबीचे धरण किंवा बंधारा बांधून एक मोठे गोड्या पाण्याचे किनारी जलाशय तयार केले जाणार आहे. यामध्ये साबरमती, माही, धाधर आणि नर्मदा यांसारख्या नद्यांमधील वाहून येणारे पाणी जमा होईल. यामुळे सुमारे १,६०० ते २,००० चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले, जगातील सर्वात मोठ्या कृत्रिम गोड्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक असणार आहे.
कल्पसर प्रकल्प गुजरात सरकारकडून विकसित केला जात आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार आणि नेदरलँड्सकडून तांत्रिक साहाय्य मिळत आहे. नेदरलँड्सची कंसल्टेंसी कंपनी या प्रकल्पाची चौकट आणि तांत्रिक साहाय्य पुरवत आहे.
गुजरातच्या कल्पसर प्रकल्पाचा अंदाजित एकूण बांधकाम खर्च ₹१.२५ लाख कोटी ते ₹१.३३ लाख कोटींच्या दरम्यान आहे. गुजरातच्या कल्पसर प्रकल्पाचे सध्याचे सचिव के. बी. राबरिया आहेत, जे या प्रकल्पावर देखरेख करत आहेत.