IRCTC Insurance Policy Good news for railway passengers 10 lakh security cover will be available in just 45 paise
भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आपल्या नव्या ट्रॅव्हल इंश्युरन्स पॉलिसीच्या धोरणात मोठा बदल केला आहे. त्यानुसार, रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना फक्त 45 पैशांत 10 लाख रुपयांचे कव्हर मिळणार आहे. ही विमा पॉलिसी ऐच्छिक आहे. मात्र, एकदा खरेदी केल्यानंतर एका पीएनआरवर (पीएनआर) प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना तो अनिवार्य होईल.
नेमका कोण घेऊ शकेल लाभ?
आयआरसीटीसीची इंश्युरन्स पॉलिसीचा लाभ केवळ भारतीय नागरिक घेऊ शकतात. विदेशी नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच ऑनलाईन तिकिट (ई-तिकिट) बुकिंग करणाऱ्या प्रवाशांनाच लाभ घेता येईल. विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी प्रति प्रवाशाला फक्त 45 पैसे मोजावे लागतील. मात्र, एजंट आणि इतर संस्थांच्या माध्यमातून तिकिट बुकिंग केल्यास विमा पॉलिसीचा लाभ घेता येणार नाही. त्याच बरोबर 5 वर्षांखालील मुलांना या योजनेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. मात्र, 5 ते 11 या वयोगटातील मुलांनी तिकिटासह किंवा विनाआसन बुकिंग केल्यास त्यांना या योजनाचा लाभ मिळू शकतो.
(फोटो सौजन्य – istock)
हे देखील वाचा – डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची विक्रमी घसरण; 1 डॉलर 84.23 रुपयांना मिळणार
कशासाठी किती मिळतील पैसे?
मृतदेह स्थलांतर करताना-
रेल्वे अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांना मृतदेह स्थलांतर करण्यासाठी 10 हजार रुपये मिळतील.
वैद्यकीय उपचार खर्च-
रेल्वे अपघातात गंभीर दुखापत झालेल्या प्रवाशांना वैद्यकीय उपचारासाठी 2 लाख रुपयांच्या विम्याचा लाभ मिळेल.
कायमस्वरुपी किंवा आंशिक अपंगत्त्व आल्यास-
रेल्वे अपघाता कायमस्वरुपी अपंगत्त्व आल्यास 100 टक्के रक्कम मिळते.तसेच आंशिक अपंगत्त्व आल्यास विम्याची 75 टक्के रक्कम मिळेल. म्हणजेच ही रक्कम 750000 लाख रुपये असू शकते.
मृत्यू ओढवल्यास-
रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकाला विम्याची 100 टक्के रक्कम म्हणजे 10 लाख रुपये मिळेल.
कसा मिळेल विमा कव्हर?
प्रवाशांना एसएमएस आणि ईमेलद्वारे विम्याची माहिती दिली जाईल.
प्रवासी त्यांच्या तिकीट बुकिंग हिस्ट्रीतून पॉलिसी क्रमांक आणि इतर माहिती तपासू शकतात.
विमा कंपनीच्या वेबसाइटवर तिकीट बुक केल्यानंतर नॉमिनीचा तपशील भरावा.
नामनिर्देशन माहिती भरली नसेल तर दाव्याच्या बाबतीत कायदेशीर वारसांना पैसे दिले जातील.
ही विमा पॉलिसी फक्त कन्फर्म आणि आरएसी तिकीट धारकांसाठीच लागू असेल.
प्रवासादरम्यान अपघात किंवा अनपेक्षित घटना घडल्यास प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी हे धोरण तयार करण्यात आले आहे.