
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जर तुम्ही आतापर्यंत पीएम किसान ई-केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर करुन घ्या. आधार आणि बँक खात्याच्या माहितीतील चुका किंवा इतर तांत्रिक समस्यांमुळे शेतकऱ्यांच्या हप्त्यांना अनेकदा विलंब होतो. त्यामुळे या प्रक्रियेसाठी विलंब करु नका. पण यासगळ्यात चांगली बातमी ही आहे की, पुढील हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे की नाही, हे तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून काही मिनिटांतच जाणून घेऊ शकता.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम DBT द्वारे शेतकऱ्याच्या बँक खात्यात ₹2,000 च्या तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केली जाते.
तुम्ही तुमची स्थिती तपासल्यास आणि तुमच्या e-KYC किंवा बँक खात्यामध्ये काही समस्या आढळल्यास, त्या त्वरित दुरुस्त करून घ्या. असे केल्याने पुढील ₹2,000 चा हप्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमच्या खात्यात पोहोचेल याची खात्री होईल.