फोटो सौजन्य - Social Media
आज भारताचा २०२६-२७ वित्तीय वर्षाचा अर्थ संकल्प म्हणजेच युनिअन बजेट सादर करण्यात येणार आहे. देशाचे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याद्वारे हे संकल्प सादर करण्यात येणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? देशाचा पहिला बजेट १८६० मध्ये एका स्कॉटीश अर्थतज्ज्ञाने सादर केला होता. पण देशाचा खरा अर्थसंकल्प स्वतंत्र्यानंतर १९४७ साली, R.K. Shanmukham Chetty यांनी सादर केला. त्या कालचा बजेट आणि आताच्या काळातील बजेटमध्ये फार मोठा फरक आहे, कारण दोन्ही बजेटमागील उद्देश फार वेगळा होता. मग 1947 सालचा बजेट आणि 2026 मधील अर्थसंकल्प यात फरक काय? दोन्ही बजेट कोणत्या मुद्द्यांवर जास्त लक्ष देतात? जाणून घेऊयात.
खर्च पाहिलात तर १९४७ सालच्या संकल्पात फक्त ₹197.३९कोटी इतका खर्च करण्यात आला होता. ही रक्कम एखाद्या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या कमाईपेक्षाही कमी भासते तर आताच्या काळात बजेटसाठी किमान लाखो कोटी खर्च केले जातात. 2026 च्या बजेटसाठी साधारण ५० लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाण्याची शक्यता भासत आहे.
1947 चा बजेट आणि 2026 च्या बजेटमधील मुख्य फरक?
१९४७ चा पहिला अर्थसंकल्प आणि २०२६ चा अर्थसंकल्प यांची तुलना केली असता, भारताच्या प्रगतीचा एक अवाढव्य प्रवास आपल्यासमोर येतो. १९४७ मध्ये भारताचा मुख्य संघर्ष हा फाळणीतून सावरण्यासाठी आणि निर्वासितांचे पुनर्वसन करण्यासाठी होता, तर २०२६ चा अर्थसंकल्प अतिवेगवान रेल्वे, एक्सप्रेसवे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या आधुनिक पायाभूत सुविधांवर भर देणारा आहे. विशेष म्हणजे, १९४७ मध्ये देशाच्या एकूण बजेटचा तब्बल ४७% हिस्सा केवळ संरक्षणावर खर्च करावा लागला होता; आज २०२६ मध्ये हा आकडा लाखो कोटींमध्ये असला तरी एकूण बजेटच्या तुलनेत त्याचे प्रमाण १५ टक्क्यांच्या आसपास आहे.
शेती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतही जमीन-अस्मानाचा फरक दिसून येतो. १९४७ मध्ये आपण केवळ भूकबळी रोखण्यासाठी आणि अन्नधान्यात स्वयंपूर्ण होण्यासाठी धडपडत होतो, पण आजचा अर्थसंकल्प अॅग्री-टेक, ड्रोन शेती आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या प्रगत विषयांवर बोलत आहे. थोडक्यात सांगायचे तर, १९४७ चे बजेट हे केवळ देश टिकवून ठेवण्यासाठी (Survival) होते, तर २०२६ चे बजेट हे भारताला जगातील एक महासत्ता आणि ‘विकसित भारत’ बनवण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.






