फोटो सौजन्य - सोशल मीडिया
डॉ. विक्रम अंबालाल साराभाई यांनी स्वप्न पाहिले की भविष्यात भारत अंतराळ विज्ञानात जगाच्या बरोबरीने वाटचाल करणारा असेल. याच ध्येयापूर्तीसाठी १९६२ मध्ये, त्यांनी इन्कोस्पार (INCOSPAR – इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च) च्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जी पुढे इस्रो (ISRO) बनली. अगदी या काळात भारताकडे संसाधने आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता होती.
हवामान अंदाज, दळणवळण प्रणाली, कृषी सहाय्य, आपत्ती व्यवस्थापन आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रात क्रांती करण्याचे ध्येय त्यांचे होते. त्यांनी वेळीच ओळखले की, अंतराळ विज्ञान केवळ रॉकेट प्रक्षेपणासाठी नाही तर देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे.
डॉ. साराभाई एका श्रीमंत कुटुंबातील असून त्याच्याकडे कशाचीही कमतरता नव्हती. पण जेव्हा देशाचा प्रश्न आला तेव्हा त्यांनी आपल्या पदासाठी केवळ एक रुपया पगार स्वीकाराला. हा नियम नसून त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. त्यांच्या मते, राष्ट्रसेवेत पैसा कमी महत्त्वाचा तर कठोर परिश्रम अधिक महत्त्वाचे आहेत.
डॉ. साराभाई यांनी केवळ इस्रोची स्थापना केली नाही तर त्यांनी अहमदाबादमध्ये फिजिकल रिसर्च लॅबोरोटरी (PRL) ची स्थापना केली. जे आता अंतराळ विज्ञानाचे पाळणाघर म्हणून ओळखले जाते. तसेच त्यांनी अनेक शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्थांची स्थापना केली आहे.
डॉ. साराभाई यांनी १९६३ मध्ये अंतराळ कार्यक्रमाची सूत्रे हाती घेऊन आधुनिक इस्रोचा पाया घातला. त्यांच्या कार्यकाळात थुंबा (केरळ) येथून रॉकेट प्रक्षेपणांना सुरुवात झाली. अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग सामान्य लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी केला पाहिजे असा त्यांचा विश्वास होता. त्यांच्या या एकत्रित कार्यामुळे त्यांना ‘भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक’ म्हटले जाते.






