• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Indias It Sector Is Back On Track

भारताचा आयटी क्षेत्र पुन्हा वेगात; 2025 मध्ये 18 लाख नोकऱ्यांची मागणी, डिजिटल स्किल्सना प्राधान्य

2025 मध्ये भारतातील आयटी नोकऱ्यांची मागणी वाढून सुमारे 18 लाखांपर्यंत पोहोचली असून यात 16 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 24, 2025 | 09:28 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारताचा आयटी क्षेत्र पुन्हा एकदा वेग पकडताना दिसत आहे. 2025 मध्ये आयटी नोकऱ्यांची मागणी वाढून सुमारे 18 लाखांपर्यंत पोहोचली आहे. या वाढीमागे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC)चा विस्तार तसेच नव्या डिजिटल तंत्रज्ञानामधील कुशल मनुष्यबळाची मोठी गरज ही प्रमुख कारणे ठरत आहेत. ताज्या अहवालानुसार, कंपन्या आता पारंपरिक कौशल्यांपेक्षा नव्या डिजिटल स्किल्स आणि अनुभवी व्यावसायिकांवर अधिक भर देताना दिसत आहेत. क्वेस कॉर्पच्या अहवालानुसार, 2025 मध्ये भारतातील आयटी नोकऱ्यांच्या एकूण मागणीत सुमारे 16 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या वाढीसाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मशीन लर्निंग (ML), सायबर सिक्युरिटी यांसारखी आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रे आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा भारतातील वाढता विस्तार जबाबदार आहे. कंपन्या आता केवळ मोठ्या संख्येने भरती करण्याऐवजी गुणवत्तापूर्ण आणि योग्य कौशल्य असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देत आहेत.

CAT 2025 चा निकाल जाहीर! लाखो MBA इच्छुकांसाठी महत्त्वाची बातमी

उभरती तंत्रज्ञान क्षेत्रे आयटी हायरिंगचे मुख्य केंद्र बनली आहेत. अहवालानुसार, 50 टक्क्यांहून अधिक आयटी भरती ही नव्या डिजिटल स्किल्सवर आधारित आहे. त्याउलट, पारंपरिक टेक स्किल्सचा वाटा एकूण मागणीत 10 टक्क्यांपेक्षाही कमी झाला असून, त्यामध्ये सातत्याने घट होत आहे. यावरून आयटी क्षेत्र वेगाने आधुनिक तंत्रज्ञानाकडे झुकत असल्याचे स्पष्ट होते. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC) आयटी हायरिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. 2025 मध्ये आयटी भरतीमध्ये GCCचा वाटा वाढून 27 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. 2024 मध्ये हा वाटा केवळ 15 टक्के होता. यावरून परदेशी कंपन्या भारताकडे आता केवळ बॅक-ऑफिस म्हणून न पाहता, मुख्य तंत्रज्ञान केंद्र म्हणून पाहत असल्याचे दिसून येते.

वेगवेगळ्या क्षेत्रांतील हायरिंग ट्रेंड पाहता, प्रोडक्ट आणि SaaS कंपन्यांनी मर्यादित प्रमाणात भरती वाढवली आहे. आयटी सर्व्हिसेस आणि कन्सल्टिंग क्षेत्रात सौम्य वाढ दिसून आली आहे. मात्र, स्टार्टअप्समध्ये फंडिंगची कमतरता असल्याने हायरिंग घटून सिंगल डिजिटच्या खालच्या पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे गुंतवणूक आणि निधीचा थेट परिणाम रोजगारावर होत असल्याचे स्पष्ट होते. अनुभवी व्यावसायिकांची मागणी सध्या सर्वाधिक आहे. आयटी क्षेत्रात 4 ते 10 वर्षांचा अनुभव असलेल्या मिड-करिअर प्रोफेशनल्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही एकूण भरतीपैकी 65 टक्के आहे. 2024 मध्ये हा आकडा 50 टक्के होता. दुसरीकडे, फ्रेशर्ससाठीच्या नोकऱ्यांचा वाटा फक्त 15 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिला आहे.

RBI मध्ये भरती! ९० पेक्षा जास्त तरुणांना देणार नोकरी, आताच करा अर्ज

शहरांबाबत बोलायचे झाल्यास, आयटी हायरिंगचा केंद्रबिंदू अजूनही टियर-1 शहरांभोवतीच आहे. 2025 मध्ये सुमारे 88 ते 90 टक्के भरती बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, चेन्नई आणि दिल्ली-एनसीआर या प्रमुख शहरांमध्ये झाली आहे. तसेच, भरती प्रक्रियेसाठी लागणारा सरासरी कालावधी वाढून 45 ते 60 दिवसांपर्यंत गेला आहे. AI, ML आणि सायबर सिक्युरिटीसारख्या विशेष क्षेत्रांमध्ये भरतीसाठी अधिक वेळ लागत आहे. या पदांसाठी 75 ते 90 दिवसांपर्यंत कालावधी लागत असून, तीव्र स्पर्धा आणि कठोर स्किल असेसमेंट ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. यावरून कंपन्या योग्य टॅलेंट मिळवण्यासाठी अधिक वेळ आणि मेहनत घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट होते.

Web Title: Indias it sector is back on track

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 04:15 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हम खडे तो सबसे बडे! Tata Motors च्या ‘या’ Electric Car ने ग्राहकांची मनं जिंकली, 1 लाख युनिट्स सोल्ड आऊट

हम खडे तो सबसे बडे! Tata Motors च्या ‘या’ Electric Car ने ग्राहकांची मनं जिंकली, 1 लाख युनिट्स सोल्ड आऊट

Dec 24, 2025 | 09:24 PM
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘सुवर्ण उड्डाण’! २५ डिसेंबरपासून विमानसेवा सुरू; पहिल्याच दिवशी ३० विमानांची ये-जा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘सुवर्ण उड्डाण’! २५ डिसेंबरपासून विमानसेवा सुरू; पहिल्याच दिवशी ३० विमानांची ये-जा

Dec 24, 2025 | 09:16 PM
Clothes Drying Tips: हिवाळ्यात कपडे पटकन वासरहित कसे सुकवायचे? जाणून घ्या 5 सोपे उपाय

Clothes Drying Tips: हिवाळ्यात कपडे पटकन वासरहित कसे सुकवायचे? जाणून घ्या 5 सोपे उपाय

Dec 24, 2025 | 09:13 PM
ख्रिसमसचे प्रतीक ठरलेले ‘जिंगल बेल्स’ मूळात वेगळ्याच सणासाठी लिहिले गेले होते, जाणून घ्या अनोखी कथा 

ख्रिसमसचे प्रतीक ठरलेले ‘जिंगल बेल्स’ मूळात वेगळ्याच सणासाठी लिहिले गेले होते, जाणून घ्या अनोखी कथा 

Dec 24, 2025 | 08:55 PM
Ahilyanagar News: आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात जामखेडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा

Ahilyanagar News: आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात जामखेडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा

Dec 24, 2025 | 08:54 PM
अर्जुन खोतकरांनी अल्टीमेटमच्या गोष्टी करु नये; भाजपच्या माजी आमदाराचा इशारा

अर्जुन खोतकरांनी अल्टीमेटमच्या गोष्टी करु नये; भाजपच्या माजी आमदाराचा इशारा

Dec 24, 2025 | 08:35 PM
IPL लिलावात कुणी भाव दिला नाही! Vijay Hazare Trophy मध्ये ‘त्या’ पठ्ठ्यानं ठोकलं द्विशतक; खेळली 212 धावांची वादळी खेळी

IPL लिलावात कुणी भाव दिला नाही! Vijay Hazare Trophy मध्ये ‘त्या’ पठ्ठ्यानं ठोकलं द्विशतक; खेळली 212 धावांची वादळी खेळी

Dec 24, 2025 | 08:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : भाजपच्या तासगाव ग्रामीण तालुका अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी

Sangli News : भाजपच्या तासगाव ग्रामीण तालुका अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी

Dec 24, 2025 | 08:27 PM
Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Dec 24, 2025 | 08:21 PM
Ratnagiri : गणपतीपुळ्यात जिल्हास्तरीय ‘सरस’ प्रदर्शनाला सुरुवात

Ratnagiri : गणपतीपुळ्यात जिल्हास्तरीय ‘सरस’ प्रदर्शनाला सुरुवात

Dec 24, 2025 | 08:16 PM
Nashik : काँग्रेस पक्षाला मोठा धक्का; नगरसेवक राहुल दिवे यांनी दिला पदाचा राजीनामा

Nashik : काँग्रेस पक्षाला मोठा धक्का; नगरसेवक राहुल दिवे यांनी दिला पदाचा राजीनामा

Dec 24, 2025 | 08:10 PM
Thane : ठाण्याच्या 400 वर्ष जुन्या सेंट जॉन चर्चमध्ये नाताळाची तयारी पूर्ण

Thane : ठाण्याच्या 400 वर्ष जुन्या सेंट जॉन चर्चमध्ये नाताळाची तयारी पूर्ण

Dec 24, 2025 | 08:04 PM
Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Dec 24, 2025 | 02:48 PM
Mira Bhayandar : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मीरा भाईंदरमध्ये मोठा जल्लोष

Mira Bhayandar : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मीरा भाईंदरमध्ये मोठा जल्लोष

Dec 24, 2025 | 02:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.