सौजन्य - नवराष्ट्र टीम
या उपक्रमांतर्गत रस्त्यांवर नवीन स्ट्रीट लाईट पोल बसविल्यामुळे परिसर अधिक प्रकाशमान होणार असून, सुरक्षिततेत लक्षणीय वाढ होणार आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांची व महिलांची सुरक्षित हालचाल सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच नव्या जलवाहिन्यांमुळे पाणीपुरवठा अधिक सुरळीत, दाबयुक्त व नियमित होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन आदर्श नगरपंचायत उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मुलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न
नगरसेवक ॲड. राहुल तावरे यांनी, “मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील. नागरिकांच्या दैनंदिन गरजांना प्राधान्य देत प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यास आम्ही कटिबद्ध आहोत,” असे सांगितले. याप्रसंगी रवींद्र बडदे, सुनील माळवदकर, रमेश तावरे, सोनू जाधव, अमित तावरे, आदित्य खोटे, सागर फरतडे, सुनील जाधव, सुरेश जराड, रवींद्र सुतार, संग्राम तावरे, नितीन तावरे, चेतन तावरे व दिलीप तावरे उपस्थित होते. प्रभाग क्रमांक ९ मधील रहिवाशांनी या विकासकामांचे स्वागत करत समाधान व्यक्त केले असून, पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






