वसई पूर्वेतील वसंत नगरी मैदान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काही महिन्यांपूर्वी येथे भरलेल्या मेळ्यात नालासोपारा येथील एका अल्पवयीन मुलाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडत संबंधित जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. त्या वेळी महानगरपालिकेकडून हे मैदान पुढे कोणत्याही कार्यक्रमासाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार नाही, असा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एका कार्यक्रमासाठी मैदान उपलब्ध करून देण्यात आल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाचे आश्वासन केवळ कागदोपत्रीच राहिले का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
वसई पूर्वेतील वसंत नगरी मैदान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काही महिन्यांपूर्वी येथे भरलेल्या मेळ्यात नालासोपारा येथील एका अल्पवयीन मुलाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडत संबंधित जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. त्या वेळी महानगरपालिकेकडून हे मैदान पुढे कोणत्याही कार्यक्रमासाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार नाही, असा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एका कार्यक्रमासाठी मैदान उपलब्ध करून देण्यात आल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाचे आश्वासन केवळ कागदोपत्रीच राहिले का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.






