उन्हाचा कडाका वाढला! विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय (Photo Credit- X)
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दुपारच्या वेळी वाढणाऱ्या उष्णतेमुळे लहान मुलांना डिहायड्रेशन, चक्कर येणे किंवा उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारच्या कडक उन्हात विद्यार्थ्यांना घरी जावे लागू नये, यासाठी सकाळचे सत्र अधिक सोयीचे ठरणार आहे. असे असेल शाळांचे नवीन वेळापत्रक प्रशासनाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, शाळांच्या वेळेत खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत:
शाळेची वेळ बदलली असली तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची भीती बाळगण्याची गरज नाही. शिक्षण हक्क कायदा (RTE) २००९ नुसार निश्चित करण्यात आलेल्या वार्षिक अध्यापन तासांमध्ये कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. केवळ उन्हाचा त्रास टाळण्यासाठी वेळेचे नियोजन बदलण्यात आले आहे.
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, हा बदल केवळ एकाच सत्रात चालणाऱ्या शाळांसाठी लागू असेल. ज्या शाळा दोन सत्रांमध्ये (Morning and Afternoon Shift) चालतात, त्यांच्या वेळेत सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, उष्णतेची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो. या निर्णयामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, प्रशासनाने विद्यार्थ्यांना शाळेत पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था ठेवण्याचे आदेशही मुख्याध्यापकांना दिले आहेत.






