crime (फोटो सौजन्य- pinterest)
भिवंडीतील बेपत्ता असलेले पॉवरलूम व्यावसायिक फरहत अखलाक शेख (वय 54) यांची हत्या झाल्याचा समोर आलं आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेख यांचा मृतदेह भिवंडीतील कारवली गावाजवळील जंगलात कुजलेल्या अवस्थेत सापडला. आरोपीने शेख यांच्या व्हॅट्सऍपवरून कुटुंबियांकडून तीन लाखांची खंडणीही मागितल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरु आहे.
७० वर्षीय प्रियकर आणि ५० वर्षीय प्रेयसीला अटक, GRPने पकडताच जे कळालं ते ऐकून धक्का बसेल…
नेमकं काय प्रकरण?
भिवंडीतील शहरातील गैबी नगर परिसरात राहणाऱ्या पावरलूम व्यवसायिक फरहत अखलाक शेख हे १२ एप्रिलला घरी न आल्याने घरच्यांनी शोध घेतला. अनेकदा त्यांनी कॉल केला मात्र मोबाईल स्विच ऑफ येत होता. म्हणून कुटुंबीयांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत मिसिंग रिपोर्ट दाखल केली. पोलिसांनी तपास घेत असतानाच कुटुंबीयांना शेखच्या व्हाट्सअपवरुन एक मेसेज आला. त्यात तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.
कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
शनिवारी सकाळपासून बेपत्ता असलेला फरहत शेख यांचा मृतदेह भिवंडी पोलिसांनी कारिवली गावच्या जंगलात सापडून आला. हा मृतदेह चार दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी भोईवाडा पोलीस दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी तो भिवंडी येथील शासकीय रुग्णालयात पाठवला .
सीसीटीव्ही फुटेज हाती
फरहत शेख हे आपल्या स्कूटरवरुन एका पिवळा शर्ट घातलेल्या तरुणासोबत कारिवली गावाच्या दिशेने गेले होते असं पोलिस तपासामध्ये समोर आलं. त्याचा सीसीटीव्हीही पोलिसांच्या हाती लागला.
व्हॉट्सअॅपवरून मॅसेज
फरहत शेख यांचे मोबाईल सिम दुसऱ्या फोनमध्ये टाकून व्हॉट्सअॅपवरून मॅसेज केले जात होते. त्याचा अपघात झाल्याचे सुरवातीला सांगितले गेले. परंतु नंतर ८० हजार रुपयांची मागणी झाली. ही रक्कम वाढत गेली तीन लाखांपर्यंत. सर्व चर्चा हे मॅसेजद्वारा करण्यात आली. पैशाची मागणी देखील मॅसेज स्वरूपात झाली. आधी पोलिसांना पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागातील झोपडपट्टीत तो मोबाईल वापरला जात असल्याचा सुगावा लागला. पोलीस तिथे पोहोचले होते, मात्र आरोपी सतत लोकेशन बदलत होते आणि पोलिसांना चकवा देत होते. चार दिवसांच्या शोध मोहिमेनंतर फरहत शेख यांचा मृतदेह कारिवली गावच्या जंगलात कुजलेल्या अवस्थेत सापडला.
आरोपीचा तपस सुरु
फरहत शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील आजमगढ़ येथील रहिवासी असून ते भिवंडीतील गैबीनगर परिसरात पत्नी व चार मुलींसह राहत होते. ते पॉवरलूम व्यवसाय आणि बिल्डरचे काम करायचे. पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत असून आरोपीचा कसून शोध करत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.