
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
हत्या झालेल्या तरुणाचे नाव प्रदीप माळी असे आहे. तप्रदीप हा हमालीचे काम करत होता. प्रदीप नऊ वाजल्यापासून तो बेपत्ता होता. त्यामुळे त्याच्या घरच्यांची चिंता वाढली होती. पोलिसांनी तपास सुरु केला आणि सीसीटीव्ही व्हिडीओ पाहिले तेव्हा त्यांना दिसले की, तो दोन लोकांसह गाडीवरून जात होता. पोलीस तपास करत असतांना प्रदीप माळीची हत्या झाल्याचं समोर आलं. साडेसात वाजता त्याची बॉडी आढळली. प्रदीप माळी याचं शव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पण दगडाने ठेचून मारल्यामुळे तो मृतदेह त्याचाच आहे कि नाही? असा प्रश्न उपस्थित होत होता.
Solapur Crime: सोलापुरात संतापजनक घटना! एक्स बॉयफ्रेंडकडून 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेची हत्या
पोलिसांनी प्रदीपचे खिसे तपासले तेव्हा त्यांना त्याच्या खिशात तळहाताऐवढी लग्नपत्रिका सापडली. प्रदीपच्या हातावर एक टॅटू देखील होता. हातातील टॅटूमुळे प्रदीपची लगेच ओळख पटली अन् पोलिसांनी हिंट मिळाली. पोलिसांनी पुन्हा सीसीटीव्ही तपासली.तेव्हा विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर हे दुचाकीवरुन
जातांना दिसले. त्यानंतर लगेच त्यांनी दोघांना अटक केली.
जुन्या वादातून हत्या
१३ मार्चला चेतन कानडे याने मयत प्रदीपची पानटपरी जाळली होती. त्यावरून प्रदीप आणि विजय वैद्यकार यांच्यात वाद झाला होता. या जुन्या वादातूनच ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रदीपचे वडील राजेंद्र माळी यांनी दिलेल्या फिर्यादीत चेतन कानडे हत्येचा सूत्रधार असल्याचा आरोप केलाय. नगरपरिषदेच्या उद्यानासमोर प्रदीपची हत्या करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.
Latur Crime: रात्री घराबाहेर पडल्या, सकाळी विहिरीत मृतदेह; आईसह दोन मुलांचा अंत
Ans: जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात.
Ans: खिशात सापडलेल्या लग्नपत्रिका आणि हातावरील टॅटूमुळे.
Ans: जुन्या वादातून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे