
प्रेयसीच्या मोहात बाप झाला हैवान! 3 मुलींची हत्या, आईने मुलाला कुशीत घेऊन वाचवला जीव
धक्कादायक ! नर्सिंगच्या फीसाठी पैसे नाहीत म्हणून विद्यार्थिनी नैराश्येत; गळफास घेऊन संपवलं जीवन
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. नेहमीप्रमाणे संपूर्ण कुटुंब शांत झोपलेलं होतं. यावेळीच आरोपी वडिल नंदू यादव उर्फ नंदकिशोर यादव (45 वर्ष) यांनी घरात ठेवलेले धारदार शस्त्र उचलले आणि झोपेत असलेल्या तीनही मुलींचा गळा चिरुन त्यांची हत्या केली. मृतकांमध्ये त्यांची मोठी मुलगी पल्लवी कुमारी (12 वर्ष) आणि दोन जुळ्या बहिणी रिद्धि कुमारी (6 वर्ष) आणि सिद्धि कुमारी (6 वर्ष) यांचा समावेश होता. तीनही मुली झोपेत असल्याने त्यांना बचावासाठी प्रयत्न करता आला नाही आणि झोपेतच बेडवर तडफडत त्यांचा मृत्यू झाला.
आईने मुलाला घेऊन पळण्यात यशस्वी
वडिल मुलींचा गळा चिरत असताना त्यांनी जोरात किंचाळायला सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून आरोपीची पत्नी राधा देवी या झोपेतून उठल्या आणि त्यांनी जे पाहिले ते पाहून त्यांच्या पायाखालची जमिन हादरली. आपल्या तिन्ही मुलींना रक्ताच्या थारोळ्यात पडून आपल्या डोळ्यांदेखत मरताना पाहून ती घाबरली आणि तिच्या मनात मुलाचा विचार आला. खुनी पती नंदु यादव याने पत्नी आणि त्याच्या लहान मुलावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण राधा देवी हिमतीने आपल्या मुलाला घेऊन तिथून पळून गेली. अंधाऱ्याचा फायदा घेत आई-लेक शेजाऱ्यांच्या घरी जाऊन लपले.
अनैतिक संबंध ठरले हत्येचे कारण
ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आोरपी नंदकिशोर यादव एका फॅक्ट्रीत ड्रायव्हरचे काम करत होता. मागील काही काळापासून त्याचे दुसऱ्या गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध सुरु होते. या अनैतिक संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद आणि भांडणे होत होती. सोमवारी देखील घरात यावरुन मोठा वाद झाला ज्याचा शेवट पतीने मुलांच्या हत्येने केला.
पोलिसांनी केली आरोपीला केली अटक
तिन्ही मुलींची हत्या केल्यानंतर गावात खळबळ उडाली आणि घटनास्थळी मोठा जमाव निर्माण झाला. गावकऱ्यांनी माहिती मिळताच लगेच पोलिसांना बोलवले ज्यानंतर पोलिस तत्काळ घटनेस्थळी दाखल झाली. आरोपी वडिल घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पण पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच त्याला पकडलं आणि घेरून त्याला आपल्या ताब्यात घेतलं. पोलिस सध्या आरोपीची चाैकशी करुन त्याच्या मानसिक स्थितीचा तपास घेत आहेत. पोलिसांनी तीन्ही मुलींच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवलं असून पोस्टमीर्टम रिपोर्टची प्रतीक्षा केली जात आहे.